शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सात ग्रामपंचायतीत दीड कोटींची २२९ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:59 IST

महाराष्ट्र शासनाचा सर्वात यशस्वी व महत्वकांक्षी उपक्रम जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात प्रभावी व योग्य रित्या अंमलात आणण्यात येत आहे.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार योजना : आदिवासी क्षेत्राची जलक्रांतीकडे वाटचाल

विजय मानकर ।ऑनलाईन लोकमतसालेकसा : महाराष्ट्र शासनाचा सर्वात यशस्वी व महत्वकांक्षी उपक्रम जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण राज्यात प्रभावी व योग्य रित्या अंमलात आणण्यात येत आहे. या उपक्रमाचा अभूतपूर्व लाभ सर्व सामान्य शेतकरी वर्गाला मिळेल. ऐवढेच नाही तर येणाऱ्या काळात राज्यात जलक्रांती घडल्या शिवाय राहणार नाही. याची अनेक उदाहरणे आता सालेकसा तालुक्यात सुद्धा दिसू लागली आहेत.मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसºया टप्यात २०१६ -१७ या वित्तीय वर्षात तालुक्यातील सात ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यानुसार सात ग्रामपंचायतींत एकूण नऊ गावांमध्ये २२९ कामांची निवड करुन त्यासाठी शासनाकडून एक कोटी ५६ लाख १६ हजार ८१ रुपये एवढा निधी मंजूर करुन कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली. या निधीचा वापर करीत निर्धारित कालावधीत सर्व २२९ कामे पूर्ण झाली असून सर्व कामांत एकूण एक कोटी १८ लाख ४१ हजार ६७३ रुपये खर्च करण्यात आले.तालुक्यातील ज्या सात ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती त्यात दरेकसा, कोसमतर्रा, गांधीटोला, सालेकसा, मानागड, कुलरभट्टी आणि पांढरवाणी या ग्रामपंचायतींतील एकूण नऊ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व ग्रामपंचायत आदिवासी व अतिदुर्गम भागातील असून या भागात गरीब आदिवासी व मागासलेले आणि वरथेंबी पावसावर अवलंबून असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर राहतात. जलयुक्त शिवार योजनेच्या विविध कामांमुळे जास्तीत जास्त शेतकºयांची शेती सुजलाम सुफलाम होणार असून या भागात जलक्रांती पासून हरितक्रांती घडण्याकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे.जलयुक्त शिवार अभियानातून गरीब आदिवासी शेतकºयांची शेती फुलणारच त्याच बरोबर हिरव्यागार वनराईची वाढ होवून जंगल परिसरात सुद्धा ठिकठिकाणी वर्षभर पाण्याची उपलब्धता कायम राहील. त्यामुळे वन्यजीव व जनावरांना पाण्याचे दुर्भिक्ष भासणार नाही. महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागामार्फत जलयुक्त शिवार अभियानातून करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये प्रत्येक गावात बोडी दुरुस्ती, नाला बांधकाम, गाळ काढणे, भात खाचर दुरुस्ती व इतर प्रकारची कामे करण्यात आली.यात दरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत मुरकुटडोहच्या तिन्ही गावांत मिळून एकूण ४३ ठिकाणी बोडी दुरुस्तीची व सात ठिकाणी भात खाचर दुरुस्ती करण्यात आली. तीन ठिकाणी नाला बांधकाम आणि १० ठिकाणी गाळ काढण्याची कामे करण्यात आली. एकंदरित ३४ लाख ६८ हजार रुपयांची एकूण ६३ कामे करण्यात आली. याच ग्रामपंचायतच्या दंडारीच्या दोन्ही गावात एकूण नऊ लाख ४९ हजार रुपयांची २५ कामे करण्यात आली. यात बोडी दुरुस्तीची १५ कामे, गाळ काढण्याची सात कामे, भात खाचर दुरुस्तीची दोन आणि नाला बांधकामाच्या एका कामाचा समावेश आहे.कोसमतर्रा ग्रामपंचायत अंतर्गत कोसमतर्रा आणि नवाटोला या गावात १९ लाख ४१ हजार रुपयांची ३२ कामे करण्यात आली. यामध्ये १७ कामे बोडी दुरुस्तीची, १२ कामे गाळ काढण्याची आणि तीन कामे नाला बांधकामाची करण्यात आली. मानागड ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ३० कामे करण्यात आली. यासाठी १४ लाख ५७ हजार रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये २० कामे बोडी दुरुस्तीची, आठ कामे गाळ काढण्याची आणि प्रत्येकी एक काम नाला बांधकाम आणि भात खाचर दुरुस्तीचे करण्यात आले.कुलरभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत सुद्धा एकूण ३० कामे करण्यात आली. यासाठी १४ लाख ५४ हजार रुपये खर्च झाले. यात १२ कामे गाळ काढण्याची १५ कामे बोडी दुरुस्तीची आणि एक काम भात खाचर दुरुस्तीचे करण्यात आले. पांढरवाणीमध्ये पाच लाख ४६ हजार रुपयांची एकूण १५ कामे करण्यात आली. यामध्ये ११ कामे बोडी दुरुस्तीची, तीन कामे गाळ काढण्याची आणि एक काम भात खाचर दुरुस्तीचे करण्यात आले. गांधीटोला ग्रामपंचायत अंतर्गत पाच लाख ६६ हजार रुपयांची एकूण २१ कामे करण्यात आली. यामध्ये पाच कामे गाळ काढणे, १४ कामे भात खाचर दुरुस्ती आणि दोन कामे बोडी दुरुस्तीची करण्यात आली.सालेकसा ग्रामपंचायत अंतर्गत १४ लाख ९८ हजार रुपयांची एकूण १३ कामे करण्यात आली. यामध्ये सात कामे भातखाचर दुरुस्ती, तीन कामे गाळ काढण्याची दोन कामे बोडी दुरुस्तीची आणि एक काम नाला बांधकामाचे करण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेच्या या विविध कामांमध्ये बोडी दुरुस्तीसाठी जवळपास ४२ हजाराच्या वर एका बोडीसाठी शासनाने मंजूर केले. त्यापैकी त्यापेक्षा कमी खर्चाने बोडी दुरुस्तीची कामे झाली. न्यायप्रमाणे नाला बांधकामासाठी दोन ते तीन लाखापर्यंत भात खाचर दुरुस्तीसाठी एक ते दोन लाखपर्यंत, गाळ काढण्यासाठी ५० हजारांवर कामाच्या आधारावर रक्कम मंजूर करण्यात आली. येणाºया काळात जलयुक्त शिवार अभियानाचा मोठा लाभ मिळणार असून पाण्याच्या तात्पुरत्या व दिर्घकाळ समस्येवर बहुतेक प्रमाणात नियंत्रण मिळू शकते. तसेच जमिनीत पाण्याची पातळी वाढविण्यास सुद्धा मोठी मदत मिळेल.