शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

डिसेंबर अखेरपर्यंत संपूर्ण लसीकरण अशक्यच, लसीकरणासाठी लागणार पुन्हा दीड वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५६ हजार ४५६ असून, यात १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण हे १० लाखांवर आहे. म्हणजेच १० लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार ८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजेच एकूण २५ टक्के लसीकरण झाले आहे. अद्यापही ७ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण होणे शक्य आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत दोन लाख ४६ नागरिकांचे लसीकरण : लसीच्या तुटवड्याने लागतोय वारंवार ब्रेक

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  कोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हेच प्रमुख शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर केंद्रित आहे. लसीकरणाला नागरिकांचा व्यापक प्रतिसाद मिळावा यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५६ हजार ४५६ असून, यात १८ वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण हे १० लाखांवर आहे. म्हणजेच १० लाख नागरिकांचे लसीकरण करावे लागणार आहे. ३० मे पर्यंत जिल्ह्यात एकूण २ लाख ४६ हजार ८९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. म्हणजेच एकूण २५ टक्के लसीकरण झाले आहे. अद्यापही ७ लाख ५० हजार नागरिकांचे लसीकरण होणे शक्य आहे. त्यामुळे यावर्षी डिसेंबरपर्यंत ५ लाख नागरिकांचे लसीकरण होण्याची शक्यता असून, संपूर्ण लसीकरणासाठी पुन्हा दीड वर्ष लागण्याची शक्यता आहे. मात्र, यासाठी जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, तर आज, सोमवारपासून जिल्ह्यातील एकूण १४० केंद्रांवर १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाला लसींचा  साठा सुद्धा प्राप्त झाला आहे. सद्य:स्थितीत 

१८ वर्षांपेक्षा कमी वयाचे काय?- लसीकरणासाठी शासनाकडून होणारा लसींचा पुरवठा लक्षात घेता ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसींचा पुरवठ्यात वाढ झाल्यानंतर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे.- कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बालकांमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मात्र, १८ वर्षांखालील बालकांना लसीकरण करण्यासंदर्भात कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. - १८ वर्षांखालील बालकांना लसीकरण करण्यासाठी सध्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. -  जिल्ह्यात १८ वर्षांखालील बालकांची संख्या अडीच लाखांवर आहे. शाळांचे शैक्षणिक सत्र लक्षात घेता त्यांचेसुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची गरज आहे.  

आधी केवळ ४५ केंद्रे, आता १४० कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट लवकर पूर्ण व्हावे यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी जिल्ह्यात केवळ ४५ केंद्रे होते. मात्र, लसीकरण युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी १४० लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवरून दररोज पाच ते सहा हजार नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. 

जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने सध्या लसीकरणाचे टार्गेट पुढे ठेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजन केले आहे. आतापर्यंत अडीच लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केंद्राची संख्या वाढवून लसीकरणाला गती देण्यात येईल. तसेच नागरिकांनी सुद्धा लसीकरण मोहिमेला सहकार्य करावे. दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या