शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर सर्वेक्षण पूर्ण

By admin | Updated: May 18, 2014 23:39 IST

पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे

 ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाययोजना : पाणी टंचाई आराखडा फिस्कटला

 गोंदिया : पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे. यासाठी विभागाने आपला अहवाल (प्रपत्र ब) उप विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र पावसाळ््याच्या तोंडावर सर्वेक्षण पूर्ण झाल्याने आता पाणी टंचाई निवारणार्थ काय कामे केली जाणार असा प्रश्न यातून उपस्थित होतो. उन्हाळ््यात ग्रामीण भागात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईला लक्षात घेता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये गोंदिया तालुक्यातील २१ गावे/वाड्यांसाठी, गोरेगाव तालुक्यात १२ गावे/वाड्यांसाठी, सडक अर्जुनी तालुक्यात सात गावे/वाड्यांसाठी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १८ गावे/वाड्या, तिरोडा तालुक्यात १० गावे/वाड्या, सालेकसा तालुक्यात पाच वाड्या, देवरी तालुक्यात २० गावे/वाड्या तर आमगाव तालुक्यातील ११ गावे/वाड्या अशाप्रकारे १०४ गावे/वाड्यांसाठी साठी हा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ६९ गावे/वाड्यांत नवीन विंधन विहीर, १ गावात नळ योजना विशेष दुरूस्ती, ३४ गावे/वाड्यांत विहीर खोलीकरण व इनवेल बोअर तर ५ वाड्यांत खासगी विहीर अधिग्रहण यासारख्या १११ उपाययोजना करावयाच्या होत्या. यासाठी सर्वप्रथम विभागातील भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. यात त्यांनी मंजूर केलेल्या उपाययोजनांचा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला जाणार आहे. आश्चर्याची बाब अशी की, ७ जून पासून मान्सून सुरू होते. अशात मात्र १३ मे रोजी भुवैज्ञानिकांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले. सर्वेक्षणात त्यांनी ४९ गावे/वाड्यांत ५० नवीन विंधन विहीर, आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा येथे नळ योजना विशेष दुरूस्ती, १३ गावे/वाड्यांत १४ विहीर खोलीकरण तर सालेकसा तालुक्यातील रामाटोला व कटराटोला या दोन गावांत खाजगी विहीर अधिग्रहण अशा ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाययोजनांना मंजूरी दिली असून शिफारस करणार आहेत. मात्र विभागाने तयार केलेला अहवाल अद्याप उपविभागीय कार्यालयाकडेच पडून आहे. आता त्यावर कारवाई झाल्यावर तो अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे जाणार. त्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिल्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ कामे केली जाणार. यात मात्र आणखीही कालावधी लागणार असून पाणी टंचाई निवारणाचा हा कार्यक्रम पूर्णपणे फिस्कटल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)