शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पावसाळ्याच्या तोंडावर सर्वेक्षण पूर्ण

By admin | Updated: May 18, 2014 23:39 IST

पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे

 ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाययोजना : पाणी टंचाई आराखडा फिस्कटला

 गोंदिया : पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे. यासाठी विभागाने आपला अहवाल (प्रपत्र ब) उप विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र पावसाळ््याच्या तोंडावर सर्वेक्षण पूर्ण झाल्याने आता पाणी टंचाई निवारणार्थ काय कामे केली जाणार असा प्रश्न यातून उपस्थित होतो. उन्हाळ््यात ग्रामीण भागात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईला लक्षात घेता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये गोंदिया तालुक्यातील २१ गावे/वाड्यांसाठी, गोरेगाव तालुक्यात १२ गावे/वाड्यांसाठी, सडक अर्जुनी तालुक्यात सात गावे/वाड्यांसाठी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १८ गावे/वाड्या, तिरोडा तालुक्यात १० गावे/वाड्या, सालेकसा तालुक्यात पाच वाड्या, देवरी तालुक्यात २० गावे/वाड्या तर आमगाव तालुक्यातील ११ गावे/वाड्या अशाप्रकारे १०४ गावे/वाड्यांसाठी साठी हा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ६९ गावे/वाड्यांत नवीन विंधन विहीर, १ गावात नळ योजना विशेष दुरूस्ती, ३४ गावे/वाड्यांत विहीर खोलीकरण व इनवेल बोअर तर ५ वाड्यांत खासगी विहीर अधिग्रहण यासारख्या १११ उपाययोजना करावयाच्या होत्या. यासाठी सर्वप्रथम विभागातील भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. यात त्यांनी मंजूर केलेल्या उपाययोजनांचा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला जाणार आहे. आश्चर्याची बाब अशी की, ७ जून पासून मान्सून सुरू होते. अशात मात्र १३ मे रोजी भुवैज्ञानिकांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले. सर्वेक्षणात त्यांनी ४९ गावे/वाड्यांत ५० नवीन विंधन विहीर, आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा येथे नळ योजना विशेष दुरूस्ती, १३ गावे/वाड्यांत १४ विहीर खोलीकरण तर सालेकसा तालुक्यातील रामाटोला व कटराटोला या दोन गावांत खाजगी विहीर अधिग्रहण अशा ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाययोजनांना मंजूरी दिली असून शिफारस करणार आहेत. मात्र विभागाने तयार केलेला अहवाल अद्याप उपविभागीय कार्यालयाकडेच पडून आहे. आता त्यावर कारवाई झाल्यावर तो अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे जाणार. त्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिल्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ कामे केली जाणार. यात मात्र आणखीही कालावधी लागणार असून पाणी टंचाई निवारणाचा हा कार्यक्रम पूर्णपणे फिस्कटल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)