शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर सर्वेक्षण पूर्ण

By admin | Updated: May 18, 2014 23:39 IST

पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे

 ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाययोजना : पाणी टंचाई आराखडा फिस्कटला

 गोंदिया : पावसाळा आता तोंडावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. या सर्वेक्षणात विभागाकडून ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाय योजना करण्याची शिफारस केली जाणार आहे. यासाठी विभागाने आपला अहवाल (प्रपत्र ब) उप विभागीय कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र पावसाळ््याच्या तोंडावर सर्वेक्षण पूर्ण झाल्याने आता पाणी टंचाई निवारणार्थ काय कामे केली जाणार असा प्रश्न यातून उपस्थित होतो. उन्हाळ््यात ग्रामीण भागात निर्माण होणार्‍या पाणी टंचाईला लक्षात घेता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणी टंचाई कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये गोंदिया तालुक्यातील २१ गावे/वाड्यांसाठी, गोरेगाव तालुक्यात १२ गावे/वाड्यांसाठी, सडक अर्जुनी तालुक्यात सात गावे/वाड्यांसाठी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १८ गावे/वाड्या, तिरोडा तालुक्यात १० गावे/वाड्या, सालेकसा तालुक्यात पाच वाड्या, देवरी तालुक्यात २० गावे/वाड्या तर आमगाव तालुक्यातील ११ गावे/वाड्या अशाप्रकारे १०४ गावे/वाड्यांसाठी साठी हा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. यात ६९ गावे/वाड्यांत नवीन विंधन विहीर, १ गावात नळ योजना विशेष दुरूस्ती, ३४ गावे/वाड्यांत विहीर खोलीकरण व इनवेल बोअर तर ५ वाड्यांत खासगी विहीर अधिग्रहण यासारख्या १११ उपाययोजना करावयाच्या होत्या. यासाठी सर्वप्रथम विभागातील भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण पूर्ण करावयाचे होते. यात त्यांनी मंजूर केलेल्या उपाययोजनांचा अहवाल तयार करून तो जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला जाणार आहे. आश्चर्याची बाब अशी की, ७ जून पासून मान्सून सुरू होते. अशात मात्र १३ मे रोजी भुवैज्ञानिकांचे सर्वेक्षणाचे काम पुर्ण झाले. सर्वेक्षणात त्यांनी ४९ गावे/वाड्यांत ५० नवीन विंधन विहीर, आमगाव तालुक्यातील फुक्कीमेटा येथे नळ योजना विशेष दुरूस्ती, १३ गावे/वाड्यांत १४ विहीर खोलीकरण तर सालेकसा तालुक्यातील रामाटोला व कटराटोला या दोन गावांत खाजगी विहीर अधिग्रहण अशा ६४ गावे/वाड्यांसाठी ६७ उपाययोजनांना मंजूरी दिली असून शिफारस करणार आहेत. मात्र विभागाने तयार केलेला अहवाल अद्याप उपविभागीय कार्यालयाकडेच पडून आहे. आता त्यावर कारवाई झाल्यावर तो अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे जाणार. त्यास जिल्हाधिकार्‍यांनी मंजुरी दिल्यानंतर पाणी टंचाई निवारणार्थ कामे केली जाणार. यात मात्र आणखीही कालावधी लागणार असून पाणी टंचाई निवारणाचा हा कार्यक्रम पूर्णपणे फिस्कटल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)