शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आर्थिक व सामाजिक समतेकरिता घटना दिली. मात्र ७० वर्षानंतरही आर्थिक समानता निर्माण झालेली नाही.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : उद्योजक जागृती अभियान व स्टॅण्ड अप इंडिया क्लिनिक

आॅनलाईन लोकमतगोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला आर्थिक व सामाजिक समतेकरिता घटना दिली. मात्र ७० वर्षानंतरही आर्थिक समानता निर्माण झालेली नाही. काही विशिष्ट वर्गांच्या २० टक्के लोकांकडे ८० टक्के संपत्ती एकत्रीत झाल्याचे दिसून येते. याकरिता अनुसूचित जाती-जमातीच्या तरुणांनी फक्त नोकरी मागे न लागता उद्योग उभारावे व डॉ. बाबासाहेबांच्या आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण करावे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.येथील सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात शनिवारी (दि.१६) डिक्की (दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स), सीडबी व सामाजिक न्याय विभागाचा संयुक्तवतीने आयोजित उद्योजक जागृती अभियान व स्टॅण्ड अप इंडिया क्लिनिक कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, सीडबीचे उप महाव्यवस्थापक पी.के. नाथ, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशीक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, बँक आॅफ इंडियाचे नोडल अधिकारी सिल्हारे, जात पडताळणी समितीचे देवसुदन धारगावे, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त मंगेश वानखेडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, बान्ते, डिक्कीचे पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेडके, विदर्भ अध्यक्ष गोपाल वासनिक उपस्थित होते.पुढे बोलताना ना. बडोले यांनी, अनुसूचित जाती व जमातीच्या लोकांनी उद्योग उभारणीसाठी पुढे येण्याची गरज आहे. मुद्रा लोन, स्टॅण्ड अप इंडिया आदी योजनांच्या माध्यमातून उद्योग लावून स्वत:ची बेरोजगारी दूर करून अनेक हातांना काम देणारे बना. याकरिता बरेच संघर्ष व परिश्रम घ्यावे लागते. बँकांनी सुद्धा यांना सहकार्य करण्याची गरज असून उद्योग उभारणीला मदत करावी. ‘स्टॅण्ड अप योजनेतून १० लाख ते १ कोटीपर्यंत लोन मिळते. अनुसूचित जाती-जमाती व महिलांना या योजनेत मोठी संधी आहे. आकडेवारीनुसार ज्या प्रमाणात योजनांचा लाभ घ्यायला पाहिजे होता, त्या पद्धतीने अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गाने घेतलेला नाही. यामुळेच डिक्की, सीडबी व सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून १०० उद्योजक वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्याच्या कार्यक्र म हाती घेण्यात आला असल्याचे सांगीतले.पद्मश्री कांबळे यांनी, आजघडीला देशात ३० कोटी जनता ही अनुसूचित जाती- जमातींची आहे. यात १८ ते ३५ वयोगटातील ६२ टक्के लोकसंख्या असून १९ कोटी संख्या ही तरु णांची आहे. या तरु णांच्या शक्तीला उद्योग धद्यांची जोड देवून सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग तसेच नॅनो इंटरप्राईझर तयार करण्याची गरज आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून ७ कोटी लोकांनी याचा लाभ घेतला. यात १५ टक्के हे अनुसूचित जाती-जमातीचे असून यांची संख्या १ कोटी ५ लाख आहे. आर्थिक समानतेच्या कामात शासनाच्या मुद्रा योजनेचा मोठा हातभार लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी आमदार संजय पुराम यांनीही कार्यक्रमाला उपस्थि युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सीडबीचे नाथ यांनी, स्टॅण्ड अप योजने ची सविस्तर माहिती दिली. बान्ते यांनी मुद्रा योजनेबद्दल माहिती दिली. तर नोडल अधिकारी सिल्हारे यांनी जिल्ह्यात मुद्रा योजना व इतर योजनांच्या माध्यमातून उद्योजकांना केलेल्या कर्ज पुरवठा व बँकिंग प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केले.संचालन निश्चय शेडके यांनी केले. आभार क्र ांती गेडाम यांनी मानले. कार्यक्र मासाठी डिक्कीचे चंदू पाटील, जिल्हा समन्वयक दलेश नागदवने आदींनी सहकार्य केले.