शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गावातील समित्या कागदोपत्रीच

By admin | Updated: July 25, 2015 01:42 IST

गाव पातळीवरील विविध समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी गावस्तरावर विविध समित्यांचे गठन केले जाते.

खातिया : गाव पातळीवरील विविध समस्यांचे निराकरण करता यावे यासाठी गावस्तरावर विविध समित्यांचे गठन केले जाते. या समित्यांत मात्र गावातील पदाधिकारी आपल्या कार्यकर्ता किंवा जवळील व्यक्तींचा भरणा करून घेतात. शिवाय कोणत्या समितीत कोण सदस्य आहेत या बाबत सदस्यांनाही माहिती नसल्याचे प्रकार घडताहेत. शिवाय सदस्यांनाच समित्यांचे कार्यक्षेत्र व अधिकार याबबत माहिती नसल्याने या समित्या कागदोपत्रीच असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. गावातील तंट्यांचे गावातच निराकरण व्हावे या उद्देशातून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. तर या मोहिमेंतर्गत प्रत्येक गावात तंटामुक्त समिती गठित करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार प्रत्येकच गावात तंटामुक्त समिती गठित करण्यात आली आहे. याचधर्तीवर शाळांचा कारभार बघण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, जगंलांची कत्तल व अवैध वृक्षतोडीवर नजर ठेवण्यासाठी वन समिती यासह गाव पाणी पुरवठा समिती, वन हक्क समिती, ग्राम दक्षता समिती, ग्राम स्वच्छता समिती आदि प्रकारच्या समित्यांचे गठन केले जाते. अशाप्रकारच्या विविध समित्या असून या प्रत्येक समितीचे स्वतंत्र कार्यक्षेत्र असून त्यावर नजर ठेवण्याची जबाबदारी समितीकडे असते. मात्र यातील एक-दोनच समित्यांच्या कारभारावर जिल्हास्तरावरून नजर ठेवली जात असल्याने त्या कार्यरत असतात. जसे तंटामुक्त समितीच्या कारभारावरून जिल्हास्तरावरून लक्ष ठेवले असून त्यांच्या नियमीत बैठका व प्रशिक्षण होत असल्याने या समितीतील सदस्य कोण हे गावकऱ्यांना ठाऊक असते. ग्राम स्वच्छता समितीच्या कारभारावरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून लक्ष दिले जाते. मात्र कित्येक समित्या फक्त गठित करून ठेवणे पुरेसे असते. र गावातील लोकांनाही विविध प्रकारच्या समित्यांच्या कार्या विषयी माहिती राहत नसल्याने त्यांना इतरत्र भटकावे लागते. ग्रामीण भागातील हि वास्तविकता असून गावकऱ्यांना प्रत्येक समितीबाबत माहिती असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे वर्षातून एखाद्यावेळी या समित्यांना घेऊन विचारणा होत असल्याने या समित्यांचे सदस्य व पदाधिकारीही राहतात तेच राहतात असे चित्रही बघावयास मिळते. मात्र या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याचे गरज आहे.