शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
3
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
4
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
5
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
6
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
7
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
8
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
9
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
10
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
11
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
12
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
13
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
14
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
15
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
16
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
18
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
19
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
20
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह

जिल्हाधिकारी कार्यालयाला लागले रिक्तपदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नंतर अत्यंत महत्वाचे पद म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी आहे. कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील महत्वाचा दुवा असून इतर विभागासमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी या पदाकडे आहे. परंतु हे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. या पदाचा कार्यभार अतिरीक्त स्वरुपात इतर अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) हे पद सर्वसामान्य जनतेच्या रोजगाराशी सबंधीत असून गेल्या वर्षभरापासून पद रिक्त आहे.

ठळक मुद्देशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : जनतेने न्याय मागावा कुणाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा हा नक्षलग्रस्त असून नागपूर विभागातील व विदर्भातील शेवटचा जिल्हा आहे. जिल्हा प्रशासनातील अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय आहे. सर्व सामान्य जनता कोणत्याही प्रश्नाबाबत, शेती विषयक कामे व इतर अन्य स्वरुपाच्या तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्याकरिता जातात. अशा परिस्थितीत जर अधिकाऱ्यांचे पदे रिक्त असेल तर सर्वसामान्य जनतेने कोणाकडे न्याय मागावा हा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु याकडे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नंतर अत्यंत महत्वाचे पद म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी आहे. कर्मचारी व जिल्हाधिकारी यांच्यातील महत्वाचा दुवा असून इतर विभागासमवेत समन्वय साधण्याची जबाबदारी या पदाकडे आहे. परंतु हे पद जानेवारी २०२० पासून रिक्त आहे. या पदाचा कार्यभार अतिरीक्त स्वरुपात इतर अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) हे पद सर्वसामान्य जनतेच्या रोजगाराशी सबंधीत असून गेल्या वर्षभरापासून पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे सर्वात मोठा विभाग म्हणजे गोंदिया उपविभाग परंतु येथील पद सुध्दा रिक्त असून अतिरीक्त स्वरुपात अपर तहसीलदारांना कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या कामांना व कोरोनासारख्या महामारीबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजनेत कुचराई होत असल्याचे दिसून येत आहे.उपविभाग अधिकारी (तिरोडा) हे पद सुमारे २ महिन्यांपासून रिक्त आहे. जिल्ह्यातील इतर पदाची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, लिपीक संवर्ग, शिपाई, कोतवाल व पोलीस पाटील इत्यादी सर्व पदे रिक्त असून अतिरीक्त स्वरुपात इतर कर्मचाऱ्यांकडे कार्यभार असल्याचे दिसून येते.एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर अधिकारी गोंदिया जिल्ह्यात येण्यास तयार होत नाही व आले तर विहित मुदतीच्या आत आपली सोईच्या ठिकाणी बदली करुन घेतात असे दिसून येते. तर शासनही रिक्त असलेली पदे भरण्याकरीता सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून येते. तसेच जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी याबाबत एक बोलण्यास किंवा शासनाकडे पाठपुरावा करण्यास कमी पडत असल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य जनतेनी कोणाकडे न्याय मागावा असा प्रश्न जिल्ह्याला पडला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी