शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
3
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
4
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
5
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
6
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
7
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
8
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
9
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
10
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
11
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
12
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
13
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
14
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
16
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
17
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
18
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
19
आफ्रिकेतील आणखी एका देशात सत्तापालट, लष्कराने टीव्हीवर लाईव्ह येत राष्ट्रपतींना हटवलं
20
मालिका विजयानंतर विराटने रोहितची घेतली गळाभेट, तर गंभीरसोबत..., व्हिडीओ होतोय व्हायरल  
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक विवाह सोहळा म्हणजे मजबूत समाजाचा पाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:59 IST

सामूहिक विवाह सोहळ््यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ््यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : साकरीटोला येथील कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सामूहिक विवाह सोहळ््यातून फिजूल खर्चापासून सुटका होते. शिवाय स्वस्थ व मजबूत समाजाचा पाया तयार होतो. सामूहिक विवाह सोहळ््यातून समाजात सामाजिकतेच्या भावनेला वाढ मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.सालेकसा तालुक्यातील ग्राम साकरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, समिती सामूहिक विवाह सोहळ््याचे यशस्वी आयोजन करीत असून क्षेत्रात एका नव्या परंपरेला सुरूवात केली आहे. आज कित्येक संघटनांकडून सामूहिक विवाह सोहळ््यांचे आयोजन केले जात आहे. मात्र या गौरवशाली परंपरेची सुरूवात साकरीटोला येथूनच झाली आहे. सामूहिक विवाह युगलांना सामाजीक बंधनात बांधण्याचे काम करीत असतानाच समाजही एकत्रीत होवून एका मंचावर असल्याचे मत ही व्यक्त केले.विवाह सोहळ्याला माजी मंत्री भरत बहेकार, माजी खासदार नाना पटोले, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार रामरतन राऊत, कॉँग्रेस कमिटी जिल्हा महासचिव सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार केशव मानकर, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, उषा मेंढे, सुखराम फुंडे, उषा शहारे, सुनंदा बहेकार, जियालाल पंधरे, टोलसिंग पवार, संगीता कुसराम, दिलीप वाघमारे, हिरालाल फाफनवाडे, श्रावण राणा, देवराज वडगाये, संपत सोनी, नटवरलाल गांधी, विजय बहेकार, प्रमोद येटरे, लिलाधर पाथोडे, संगीता शहारे, समिती अध्यक्ष देवराम चुटे, उपाध्यक्ष अरविंद फुंडे, नामदेव दोनोडे, रामदास हत्तीमारे, पृथ्वीराज शिवणकर, पुरूषोत्तम कोरे, योगेश बहेकार, संतोष बोहरे, प्रकाश दोनोडे, संजय बागडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.आठ जोडप्यांचे शुभमंगलसाकरीटोला येथील युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने मागील १६ वर्षांपासून या सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जात आहे. यांतर्गत आतापर्यंत शेकडो जोडप्यांचा विवाह लावण्यात आला आहे. त्याचप्रकारे यंदा आठ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ या सामूहिक विवाह सोहळ््यात पाहुणे व समाजबांधवांच्या उपस्थितीत लावण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल