शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातूनच सहकार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:49 IST

विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसुभाष देशमुख : एक दिवसीय सहकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांच्या सहभागातून सहकार समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी (दि.२६) रोजी येथे केले.पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या सयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२६) कटंगी येथील मयुर लॉन येथे सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले होते.प्रमुख पाहुणे म्हणूून महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार भारती प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. मुकुंदराव तपकिर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. केशवराव मानकर, भैरिसंग नागपूरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे कार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनय खटावकर, अटल महापणन विकास अभियान प्रमुख गणेश शिंदे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. केवळ शेतीतून शेतकºयांचा विकास शक्य नाही. जोपर्यंत शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणार नाही, तोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास शक्य नाही.यासाठी ग्रामीण भागात असलेल्या विविध कार्यकारी व सेवा सहकारी संस्थाचे बळकटी करणे गरजेचे आहे. सहकारी तत्त्वावर गावात छोटे मोठे उद्योग धंदे सुरू केल्यास रोजगार निर्मितीस मदत होईल. सहकार क्षेत्रात कार्यरत लोकांनी सामाजिक बांधिलकी आणि त्यागवृत्ती बाळगण्याची गरज आहे. सहकार क्षेत्र समृध्द झाल्यास विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबतील. जिल्ह्यात सहकार क्षेत्र बळकट करुन ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले. सहकार परिषदेला शेतकरी व सहकारी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.राईस मिलला पुनरुज्जीवित करणारगोंदिया जिल्ह्यात सहकार तत्वावर आठ राईस मिल चालविले जात होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते सर्व डबघाईस येऊन बंद पडले आहेत. बंद पडलेल्या सर्व राईस मिलला पुनरुज्जीवित करुन रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.शेतकरी पुत्र म्हणविणाºयांनी काय केले?जिल्ह्यातील शेतकरी पुत्र म्हणून मिरविणाºया नेत्यांनी प्रत्येक्षात शेतकºयांसाठी मात्र काहीच केले नाही. शेतकºयांच्या हितासाठी ते एक साखर कारखाना सुध्दा उभारु शकले नाही, ही दुर्देवाची बाब आहे. अशी टिका पालकमंत्री बडोले यांनी कुणाचेही नाव न घेता केली. त्यामुळे त्यांची ही टिका नेमकी कुणावर होती, याची चर्चा आहे.