शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील लोकांच्या सहभागातूनच सहकार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 00:49 IST

विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देसुभाष देशमुख : एक दिवसीय सहकार परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विदर्भात पूर्वी सहकार चळवळ बळकट होती. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सहकार तत्त्वावर विविध उद्योग धंदे स्थापन करुन ही चळवळ बळकट करण्याची गरज आहे. यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांच्या सहभागातून सहकार समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी (दि.२६) रोजी येथे केले.पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व ग्रामीण सहकार भारती प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्या सयुक्त विद्यमाने गुरूवारी (दि.२६) कटंगी येथील मयुर लॉन येथे सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले होते.प्रमुख पाहुणे म्हणूून महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, सहकार भारती प्रकोष्ठ अध्यक्ष डॉ. मुकुंदराव तपकिर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी आ. केशवराव मानकर, भैरिसंग नागपूरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन मुंबईचे कार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष राधेश्याम अग्रवाल, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महासचिव विनय खटावकर, अटल महापणन विकास अभियान प्रमुख गणेश शिंदे उपस्थित होते. देशमुख म्हणाले, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. केवळ शेतीतून शेतकºयांचा विकास शक्य नाही. जोपर्यंत शेतकरी शेतीपूरक व्यवसाय करणार नाही, तोपर्यंत त्यांचा आर्थिक विकास शक्य नाही.यासाठी ग्रामीण भागात असलेल्या विविध कार्यकारी व सेवा सहकारी संस्थाचे बळकटी करणे गरजेचे आहे. सहकारी तत्त्वावर गावात छोटे मोठे उद्योग धंदे सुरू केल्यास रोजगार निर्मितीस मदत होईल. सहकार क्षेत्रात कार्यरत लोकांनी सामाजिक बांधिलकी आणि त्यागवृत्ती बाळगण्याची गरज आहे. सहकार क्षेत्र समृध्द झाल्यास विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबतील. जिल्ह्यात सहकार क्षेत्र बळकट करुन ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे बडोले यांनी सांगितले. सहकार परिषदेला शेतकरी व सहकारी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.राईस मिलला पुनरुज्जीवित करणारगोंदिया जिल्ह्यात सहकार तत्वावर आठ राईस मिल चालविले जात होते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते सर्व डबघाईस येऊन बंद पडले आहेत. बंद पडलेल्या सर्व राईस मिलला पुनरुज्जीवित करुन रोजगाराची संधी निर्माण करुन देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.शेतकरी पुत्र म्हणविणाºयांनी काय केले?जिल्ह्यातील शेतकरी पुत्र म्हणून मिरविणाºया नेत्यांनी प्रत्येक्षात शेतकºयांसाठी मात्र काहीच केले नाही. शेतकºयांच्या हितासाठी ते एक साखर कारखाना सुध्दा उभारु शकले नाही, ही दुर्देवाची बाब आहे. अशी टिका पालकमंत्री बडोले यांनी कुणाचेही नाव न घेता केली. त्यामुळे त्यांची ही टिका नेमकी कुणावर होती, याची चर्चा आहे.