शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

सहकारच्या निवडणुकीचा मुहूर्त सापडला

By admin | Updated: November 6, 2014 01:56 IST

गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कार्यकाळ संपूनही ज्या सहकारी संस्थांची निवडणूक करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी ...

गोंदिया : गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी कार्यकाळ संपूनही ज्या सहकारी संस्थांची निवडणूक करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी करण्याचे आदेश राज्य सहकार प्राधीकरणाच्या वतीने देण्यात आले आहे. यावर जिल्हा उपनिबंधकांनी त्वरित पाऊल उचलून ७६ सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने निवडणुकीची तयारीही सुरू करण्यात आली आहे.मागील काही वर्षात जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांचा कार्यकाळ समाप्त झाला. परंतु या संस्थांची निवडणूक होवू शकली नाही. यासाठी विविध कारणे असल्याची माहिती मिळत आहे. आता सहकारी विभागाने सहकार कायद्यात ९७ वी दुरूस्ती करून सहकारी संस्थांची निवडणूक करविण्यासाठी ‘राज्य सहकार प्राधीकरण’ गठित केले. या प्राधीकरणाला राज्यात सहकारी संस्थांची निवडणूक करविण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.गोंदियाच्या जिल्हा उपनिबंधकांनी नुकतेच विविध सहकारी संस्था ज्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे, त्यांची निवडणूक करण्याचा प्रस्ताव राज्य सहकार प्राधीकरणाकडे पाठविला. प्राधीकरणाने ३१ आॅक्टोबरला एक आदेश जाहीर करून सदर सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी करविण्याचे निर्देश दिले. ज्या सहकारी संस्थांची निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी होणार आहे, त्यात जिल्ह्यातील ७६ संस्थांचा समावेश आहे. यात गृहनिर्माण सहकारी संस्था चार, उपसा सिंचन सहकारी संस्था २८ व जंगल कामगार सहकारी तसेच वनमजूर सहकारी संस्था ४४ आहेत. एवढेच नव्हे तर निवडणुकीसाठी राज्य सहकार प्राधीकरणाने जिल्हा उपनिबंधक यांना जिल्हा सहकार निवडणूक अधिकाऱ्याच्या स्वरूपात मंजुरी दिली आहे. जिल्हा उपनिबंधक दिग्विजयसिंह अहेर यांनी यासंदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, सहकारी संस्था चार प्रकारच्या असतात. जिल्ह्यात ‘अ’ आणि ‘ब’ गटांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना आता खूप वेळ बाकी आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही, परंतु ‘क’ व ‘ड’ गटांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपूर्वी ‘ड’ गटाच्या ७६ संस्थांच्या निवडणुका करविण्यात येणार आहेत. तसेच ‘क’ गटातील सहकारी संस्थांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. पण आदेश तर ३१ डिसेंबरपूर्वीच निवडणुका करविण्याचे आदेश आहेत. अल्पावधीतच या सर्व संस्थांच्या निवडणुका करणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व संस्थांच्या निवडणुका केल्या जाणार आहेत. विद्यमान पदाधिकाऱ्यांना आता निवडणुकीसाठी धावपळ करावी लागणार आहे. पुन्हा आपलेच अधिराज्य संस्थेवर यावे यासाठी अनेक जण कामाला लागल्याचेही समजते. (प्रतिनिधी)