शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

ढगाळ वातावरणामुळे विविध पिके प्रभावित

By admin | Updated: October 27, 2014 22:37 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही

गोंदिया : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही धोका उद्भवू शकतो, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले आहे. यंदा सुरूवातीपासूनच पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. आता हलका धान कापणीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली असून धान शेतात ठेवला आहे. ढगाळ वातावरणात पाऊस कधीही पडल्यास धानाला नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका पुन्हा शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हलक्या धानाची कापणी केली नाही, त्या पिकावर सावरदेवी नामक रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यात धानाचे लोंब गळून पडते व त्यामुळे उत्पादनात घट होते. शिवाय कापलेले धान पाऊस आल्यास भिजून खराब होण्याची शक्यता आहे. भारी धानपीक परिपक्वतेत असून दाने भरण्यासाठी त्यांना उन्हाची गरज आहे. परंतु ढगाळ वातावरण त्यांना बाधक ठरत आहे. यामुळे शेतकरी पेचात सापडला आहे. डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीचे पीक प्रमुख समजले जाते. परंतु काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे तुर पीक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर अळी लागून फुले व कळ्या पोखरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बागायती पिकांमध्ये कांदा हा जमिनीतच सडण्याची शक्यता आहे. टमाटर व केळीसारखी पिकेही किरकोळ प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. भेंड्यांवर अळींनी आक्रमण केले असून मोठ्या संख्येत भेंड्या पोखरल्या गेल्या आहेत. त्यांच्याही उत्पादनात घटच होईल. एकंदरीत हे ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे. शेतकऱ्यांनी आपले विविध प्रकारचे पीक वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषधांची फवारणी केल्यास किडींचा तातडीने नायनाट करता येईल व पिके वाचविता येतील. यासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे वाटप करण्यात आले. पिकांबाबत उद्भवणाऱ्या समस्यांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, कृषी अधिकारी, सहायक व कृषिमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)