शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे विविध पिके प्रभावित

By admin | Updated: October 27, 2014 22:37 IST

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही

गोंदिया : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीसुद्धा पडल्याची माहिती आहे. अशा वातावरणामुळे धान व डाळवर्गीय पिकांसह बागायती पिकांनाही धोका उद्भवू शकतो, असे मत कृषी विभागाने व्यक्त केले आहे. यंदा सुरूवातीपासूनच पाऊस कमी प्रमाणात पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. आता हलका धान कापणीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी हलक्या धानाची कापणी केली असून धान शेतात ठेवला आहे. ढगाळ वातावरणात पाऊस कधीही पडल्यास धानाला नुकसान होऊन त्याचा आर्थिक फटका पुन्हा शेतकऱ्यांना सहन करावा लागेल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हलक्या धानाची कापणी केली नाही, त्या पिकावर सावरदेवी नामक रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यात धानाचे लोंब गळून पडते व त्यामुळे उत्पादनात घट होते. शिवाय कापलेले धान पाऊस आल्यास भिजून खराब होण्याची शक्यता आहे. भारी धानपीक परिपक्वतेत असून दाने भरण्यासाठी त्यांना उन्हाची गरज आहे. परंतु ढगाळ वातावरण त्यांना बाधक ठरत आहे. यामुळे शेतकरी पेचात सापडला आहे. डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीचे पीक प्रमुख समजले जाते. परंतु काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे तुर पीक प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर अळी लागून फुले व कळ्या पोखरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बागायती पिकांमध्ये कांदा हा जमिनीतच सडण्याची शक्यता आहे. टमाटर व केळीसारखी पिकेही किरकोळ प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. भेंड्यांवर अळींनी आक्रमण केले असून मोठ्या संख्येत भेंड्या पोखरल्या गेल्या आहेत. त्यांच्याही उत्पादनात घटच होईल. एकंदरीत हे ढगाळ वातावरण शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरले आहे. शेतकऱ्यांनी आपले विविध प्रकारचे पीक वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार औषधांची फवारणी केल्यास किडींचा तातडीने नायनाट करता येईल व पिके वाचविता येतील. यासाठी ५० टक्के अनुदानावर औषधे वाटप करण्यात आले. पिकांबाबत उद्भवणाऱ्या समस्यांच्या समाधानासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालय, कृषी अधिकारी, सहायक व कृषिमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)