शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात हागणदारीमुक्त मोहीम अपयशी; उघड्यावर शौचास जाणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 11:32 IST

बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देयोजनेची पायमल्ली

आॅनलाईन लोकमतगोंदिया : बाराभाटी जवळील संपूर्ण परिसरात लोकांचे बाहेर शौचास सुरूच आहे. गुडमॉर्निंग पथक फक्त हार-पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात व्यस्त आहेत, पण त्यांची समस्या सोडवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच ग्रामीण भागात शासनाची हागणदारीमुक्त मोहीम अपयशी ठरल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात अनेक दिवसांपासून गुडमॉर्निंग पथकाच्या भेटी सुरू आहेत. उघड्यावर बसणाऱ्यांचे स्वागत केले जाते. पण उघड्यावर बसण्याची समस्या का निर्माण झाली. याची कारणे शोधण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्वांना शौचालय देवू, असे अनेक मंचावरुन ग्रामीण भागात पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी लोकांना मोठ्याने सांगतात. यादी मागविली जाते. परंतु त्या यादीमध्ये घोळ केला जातो. असे अनेक प्रकार जिल्ह्यात उघडकीस आले आहे. एकाच लाभार्थ्याला २-३ शौचालचा लाभ दिला जातो. त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. गरजुंना मात्र उघड्यावरच बसावे लागते. या प्रकाराची दखल घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच पर्याय नसल्याने नागरिक उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. शासनातर्फे लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र त्याची अंमलबजावणी करणारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे योग्य लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.त्यामुळे कोणत्याही प्रकाराला आणि अडचणीला सामान्य नागरिकच बळी पडतो. हागणदारीमुक्त मोहिमेकडे जातीने लक्ष दिले तर अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येतील.काही ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी हे ग्रामसेवकांच्या मदतीने योजना स्वत:च्या घशात घालतात. योजनांचे पैसे स्वत: मिळवितात. ग्रामपंचायतच्या कामांचे कंत्राट स्वत:च पदाधिकारी घेवून भ्रष्टाचार करतात. अशाप्रकारे सुविधा मिळविण्याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष अधिक असते. त्यामुळे विकासाची बाजू ढासळत आहे. याकडे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. गाव हागणदारीमुक्त करण्याची मोहीम ग्रामीण भागात अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याशिवाय या योजनेचा मुळ उद्देश सिध्द होणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्य