शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

दारूचे दुकान बंद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:22 IST

येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.

ठळक मुद्देमाटरगाव येथील ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांचा पाठिंबा; ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कमाटरगाव  : येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात  यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर  मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन  ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या  आहेत.माटरगाव येथे शासनमान्य देशी दारूचे दुकान असून, सदर  दुकानाच्या २00 फूट अंतरावरच जि.प.ची उर्दू शाळा आहे.  त्यामुळे शाळेमध्ये शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांवर याचा विपरी त परिणाम होत आहे. तसेच बाजूलाच मरी मातेचे मंदिर असून, ते थे दररोज सकाळ व संध्याकाळी भाविक भक्त दर्शनासाठी जातात.  त्यामुळे भाविक भक्तांना दारुड्यांचा त्रास सहन करावा लागतो.   देशी दारूच्या दुकानासमोर धर्मशाळा असून, सदर धर्मशाळेतसुद्धा  नेहमीच धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ इत्यादी कार्यक्रम होत  असतात. त्यामुळे महिलांनासुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो.   सदर दारू दुकानासमोर लोक नेहमी दारू पिऊन धिंगाणासुद्धा  घालतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या लोकांनासुद्धा  त्रास होतो. तसेच दारूच्या या सवयीमुळे गावातील अनेकांचे संसार  उद्ध्वस्त झाले आहेत.  गावामध्ये दारूमुळे नेहमी वाद होऊन  बिकट परिस्थितीही निर्माण होत आहे. त्यामुळे येथील सरकारमान्य  देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामसभेत  ग्रामस्थांनी केली आहे. सदर मागणी महिला व पुरुषांच्यावतीने  करण्यात आली. त्याला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सकारा त्मक प्रतिसाद दिला व गावातून दारू ही कायमची हद्दपार व्हावी व  गावातील सर्व जनता ही सुखी समाधानाने नांदावी म्हणून याबाब तचा ठराव हा एकमताने मंजूर झाला आहे. सदर ठरावावर सूचक  राजेंद्र आळशी असून, अनुमोदन प्रकाश तायडे यांनी केले.सदर ठरावाच्या प्रती गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील, पालकमंत्री  ना.भाऊसाहेब फुंडकर, आमदार अँड. आकाश फुंडकर, मुंबई  पोलीस महासंचालक सतीश माथूर, जिल्हाधिकारी बुलडाणा,  विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हा पोलीस अधीक्षक  बुलडाणा, ठाणेदार जलंब आदींनासुद्धा पाठविलेल्या आहेत. 

युवकांमध्ये वाढत आहे व्यसनाधीनतेचे प्रमाणगावात दारूचे दुकान असल्यामुळे युवकांमध्येसुद्धा व्यसनाधीनतेचे  प्रमाण वाढत चालले असून, देशाचे भवितव्य समजली जाणारी  युवा पिढी व्यसनापायी बरबाद होत असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण  झालेले आहे. सदर बाबीचा त्रास माता-भगिनींना मोठय़ा प्रमाणात  सहन करावा लागतो. त्यामुळे गावात दारू उपलब्ध होऊच नये,  अशी अपेक्षा सुज्ञ पालकवर्गाकडून व्यक्त केली जात असून,  त्यांच्याकडून दारूबंदीसाठी आग्रह धरला जात आहे.