शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

स्वच्छता कर्मचाऱ्यांना घ्यावे लागणार गाव दत्तक

By admin | Updated: October 20, 2014 23:14 IST

अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत

युनिसेफचा निर्णय : निर्मल ग्रामांसाठी घेतला पुढाकारनरेश रहिले - गोंदियाअस्वच्छतेमुळे होणारी रोगराई पाहून शासनाने निर्मल ग्राम अभियानाची सुरूवात केली. परंतु या अभियानाला अधिकारी, कर्मचारीच पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्याचे समजल्याने आता निर्मल भारत अभियानाच्या अंमलबजावणीत कर्मचाऱ्यांना जन्मगाव व कार्यक्षेत्रातील एक गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घ्यावे लागणार आहे. निर्मल भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक लोणावळा येथे घेण्यात झाली होती. युनिसेफच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या बैठकीत उपायुक्त विकास, भारत निर्माणचे अधीक्षक अभियंता, पाणी व स्वच्छता अभियानाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता, सर्व जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामधील सल्लागार तज्ञ सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेत झालेल्या चर्चेदरम्यान पाणी पुरवठा जे प्रधान सचिव यांनी उपस्थित अधिकारी सल्लागार व तज्ज्ञांना आवाहन करून स्वच्छता विभागात काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव व जन्म गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी दत्तक घेण्याचा निर्धार करावा असे आवाहन केले. त्यानुसार सदर पत्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता मिशनमध्ये कार्यरत सर्व अधिकारी, सल्लागार तज्ञ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव व जन्म गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहे.