शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियान नावापुरतेच

By admin | Updated: April 21, 2015 00:43 IST

शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे,

घाणीचे साम्राज्य : स्वच्छ भारत मिशन अपयशीगोरेगाव : शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून, प्रबोधनातून बाळकडू पाजले, तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला ‘स्वच्छता अभियान’ नुसत्या कागदावरच स्वच्छ झाल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.देश स्वतंत्र होण्यापेक्षाही स्वच्छता ही अधिक महत्त्वाची आहे, असे राष्ट्रपिता महात्मा गांधी मानतात. त्यामुळे स्वच्छ व स्वयंपूर्ण खेडी करण्याचा त्यांचा माणस होता. परंतु कालौघात खेडी, शहरे अधिक अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त होत गेली. उघड्यावरील प्रात:विधीने तर मोठे संकट उभे केले. शेवटी स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभारणे सरकारला क्रमप्राप्त झाले.या चळवळीत गावची गावे सहभागी झाली. या चळवळीला कुशल व धोरणी नेतृत्व मिळाले. त्यामुळे या स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग पाहण्यासारखा होता. मात्र कालांतराने स्वच्छता चळवळीतील लोकसहभाग कमी झाल्यामुळे आजघडीला स्वच्छता अभियान नावापुरतेच मर्यादित राहिले आहे.‘स्वच्छता’ ही सर्वांची जबाबदारी आहे, हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही येथील नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावची गावे कचरामय होताना दिसत आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ या चळवळीमुळे लोकसहभागातून स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला झाली नाही. त्यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. (तालुका प्रतिनिधी)