शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

पावसाच्या आगमनानंतर सुरू आहे नाल्यांची सफाई

By admin | Updated: June 15, 2014 23:35 IST

मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपत असून पावसाळा सुरू झाला आहे. अशात मात्र नगर परिषदेला पावसाच्या आगमना नंतर शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा शहाणपणा सुचला आहे.

गोंदिया : मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपत असून पावसाळा सुरू झाला आहे. अशात मात्र नगर परिषदेला पावसाच्या आगमना नंतर शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा शहाणपणा सुचला आहे. शुक्रवारी आंबेडकर चौक ते नेहरू चौक दरम्यान नाल्यांची सफाई करण्यात आली असून अन्य भागात नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. यावरून नगर परिषदेचे मान्सून पूर्व नव्हे तर मान्सूनपश्चात नाली सफाई सुरू असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे. शहरातील खोल भागात असलेल्या कित्येक घरांत पावसाचे पाणी शिरण्याचे चित्र दरवर्षी बघावयास मिळते. अशात पावसाचे पाणी नाल्यांत साचू नये व शहरवासीयांच्या घरात पाणी शिरू नये यासाठी नगर परिषद दरवर्षी मान्सून पूर्व सफाई अभियान राबविते. यंदाही हे अभियान राबविण्यात आले मात्र याची सुरूवात मरारटोली येथील मोठे नाले जेसीबीद्वारे साफ करून करण्यात आली. त्यानंतर पालिकेचे सफाई अभियान मध्यंतरी कोठे लोप पावले होते याची काहीच खबर नव्हती. यावरून फक्त मोठ्या नाल्यांतूनच पाण्याची निकासी होते अशी पालिकेची समज असल्याचे वाटते. कारण पावसाळा तोंडावर आल्यानंतरही शहरातील लहान नाल्यांच्या सफाईकडे पालिकेचे लक्ष दिसून आले नाही. मात्र शुक्रवारपासून (दि.१३) पालिकेच्या स्वच्छता विभागाला शहरवासीयांची आठवण आली असावी व त्यांनी आंबेडकर चौक ते नेहरू चौक दरम्यान अंडरग्राऊंड नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले. शिवाय शनिवारी श्रीजी लॉंस शेजारच्या नाल्याची जेसीबीद्वारे सफाई केली. तर प्रभागांमध्येही नाल्यांच्या सफाईचे काम सुरू असल्याचे बघावयास मिळाले. आश्चर्याची बाब म्हणजे, सफाईचे हे काम सुरू असतानाच पावसाने हजेरी लावली असून मागील दोन दिवसांपासून पाऊस शहराला झोडपून काढत आहे.दुसरीकडे शहरात बघितल्यास नाल्यांची सफाई करून काढण्यात आलेला कचरा व गाळ नाल्यांच्या शेजारी पडून असल्याचे दिसून येत आहे. अशात हा कचरा व गाळ पुन्हा नाल्यांत जाणार व नाल्या पुन्हा तुंबणार. मग त्यातून पाण्याची निकासी कशी होणार व शहरवासीयांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका कसा टळणार हा चिंतनाचा विषय आहे. यातून पालिकेच्या लेटलतीफ कामकाजाचे मुर्त उदाहरण पुढे येते. वेळीच नाल्यांची सफाई करण्याची गरज होती. मात्र पालिकेने पावसाळा सुरू झाल्यावर नाली सफाईचे काम हाती घेतल्याने शहरवासी सुद्धा यावर आश्चर्य व्यक्त करीत आहेत. यास नगर परिषद सदस्य सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. नगर परिषद सदस्यांच्या कार्यप्रणालीमुळे शहरवासी त्रस्त असून आता पावसाळ््यात सुरू करण्यात आलेल्या नाली सफाईच्या अभियानाने अधिकच चिडले आहेत. यातून पालिकेचे मान्सूनपूर्व नव्हे तर मान्सून पश्चात सफाई अभियान सुरू असल्याचे शहरवासी बोलत आहेत. (शहर प्रतिनिधी)