शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST

केशोरी : जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आपात्कालीन परिस्थिती उग्ररूप धारण कीू नये या ...

केशोरी : जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आपात्कालीन परिस्थिती उग्ररूप धारण कीू नये या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

शाळा बंद असल्या तरीही जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोविड-१९ च्या संदर्भात सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवश्यकतेनुसार नियमित उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाइन वर्ग घेतील तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेकरिता परीक्षा मंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशानुसार काम करतील. सर्व माध्यमांच्या शाळांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास सबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायद्यान्वये कायदेशीर केली जाणार आहे.

.........

परीक्षांचे काय होणार, विद्यार्थी व पालकांना चिंता

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन सुरूच आहे. त्यात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पाचवी ते अकरावीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शालेय परीक्षांचा हाच कालावधी असल्याने यंदाही पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा होणार की नाही, अशी चिंता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लागली आहे.

.......

दहावी व बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे संकट

दहावी आणि बारावीच्या परीक्षा याच महिन्यात होऊ घातल्या आहेत. त्यातच आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असल्याने अशा स्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यामुळे पालकांची चिंतासुध्दा वाढली आहे.