शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST

केशोरी : जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आपात्कालीन परिस्थिती उग्ररूप धारण कीू नये या ...

केशोरी : जिल्ह्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या संकटामुळे रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आपात्कालीन परिस्थिती उग्ररूप धारण कीू नये या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा इयत्ता पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

शाळा बंद असल्या तरीही जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग ऑनलाइन सुरू राहतील तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग कोविड-१९ च्या संदर्भात सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवश्यकतेनुसार नियमित उपस्थित राहतील. शिक्षक शाळेत येऊन ऑनलाइन वर्ग घेतील तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेकरिता परीक्षा मंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या निर्देशानुसार काम करतील. सर्व माध्यमांच्या शाळांनी कोविड-१९ च्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास किंवा विरोध दर्शविल्यास सबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा भारतीय दंड संहिता तसेच साथरोग कायद्यान्वये कायदेशीर केली जाणार आहे.

.........

परीक्षांचे काय होणार, विद्यार्थी व पालकांना चिंता

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन सुरूच आहे. त्यात आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पाचवी ते अकरावीपर्यंतच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. ३० एप्रिलपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. शालेय परीक्षांचा हाच कालावधी असल्याने यंदाही पाचवी ते नववीपर्यंतच्या परीक्षा होणार की नाही, अशी चिंता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना लागली आहे.

.......

दहावी व बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचे संकट

दहावी आणि बारावीच्या परीक्षा याच महिन्यात होऊ घातल्या आहेत. त्यातच आता कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असल्याने अशा स्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर यामुळे पालकांची चिंतासुध्दा वाढली आहे.