शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 9, 2014 23:43 IST

तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या

सालेकसा : तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन  १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या लोकांत कमालीचा संताप पसरला आहे. विद्युत कार्यालयात वारंवार निवेदन करूनसुद्धा भारनियमनाबद्दल एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे.कावराबांध येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रामार्फत कावराबांध, झालिया, धानोली, नवेगाव, सोनपुरी परिसरात विद्युत पूरवठा करण्यात येते. परिसरातील गावांना वेगवेगळ्या फिडरमध्ये विभाजित करण्यात आले असून त्या फिडरअंतर्गत एकूण गावाची वीज खपत व त्यानुसार रक्कम वसुलीचे प्रमाण पाहून भारनियमन ठरविले जाते. ग्रामीण भागामध्ये अनेक लोक असे आहेत की ते नियमानुसार मीटर न लावता रोज आकडा टाकून वीज चोरी करतात. तसेच चोरीच्या विजेद्वारे अनेक विद्युतवर चालणार्‍या सोयीसुविधांचा उपयोग करतात. तर काही प्रामाणिक ग्राहक नियमानुसार मीटर लावून वीज वापर करतात. परंतु वीज चोरीचा परिणाम मीटर धारकांवर पडतो व त्यांना अधिक रक्कम भरावी लागते. काही गावात मीटर कमी असून वीज जास्त खपत केली जाते. परंतु काही गावात मीटरचे प्रमाण जास्त असून विजेची खपत कमी होते. परंतु फिडरमध्ये विभागणी केल्याने अशा दोन्ही गावांना एकाच पारड्यात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नियमित ग्राहकांनासुद्धा भारनियमनाचा जबरदस्त फटका बसत आहे. कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत पाच वॉर्डाचा समावेश असून पाच टोल्यांचा येथे समावेश करण्यात आला आहे. परंतु कावराबांधच्या वॉर्ड- १ आणि २, कावराबांध, मोहाटोला येथे एकही भारनियमन नाही तर वॉर्ड- ३, ४ व ५ मध्ये कुणबीटोला, गोवारीटोला, ब्राम्हणटोला येथे दररोज फक्त अडीच तास वीज पूरवठा होत असून दिवसभर ९ ते १0 तास भारनियमन सुरू आहे. त्यामुळे गोवारीटोला येथील नागरिक, दुकानदार, कारखानदार, व्यापारी, लघू व्यावसायीक खूपच त्रस्त झाले आहेत. सध्या सर्वत्र संगणकाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे आता सामान्य लोकांचे, व्यावसायिकांचे, कर्मचारी वर्गांंंचे किंवा कार्यालयांचे काम विद्युतअभावी होवू शकत नाही. एखाद्या महत्वाच्या दिवशी लोक भारनियमन बंद करण्याची विनवणी करुनसुद्धा काही तासासाठीसुद्धा भारनियमन थांबविण्यात येत नाही. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात मतदानाच्या दिवशी व मतगणनेच्या दिवशीसुद्धा भारनियमन सुरुच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सामान्य मानसापासून अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणा व निर्दयीपणामुळे कावराबांध, सोनपुरी, नवेगाव परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. सध्या जून महिना सुरू असून तापमान वाढला आहे. त्यामुळे  प्रचंड उकाळा सुरू आहे. अशात विद्युत भारनियमन होत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. लोकांचा राग अनावर झाल्यास अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही. भारनियमन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)