शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 9, 2014 23:43 IST

तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या

सालेकसा : तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन  १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या लोकांत कमालीचा संताप पसरला आहे. विद्युत कार्यालयात वारंवार निवेदन करूनसुद्धा भारनियमनाबद्दल एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे.कावराबांध येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रामार्फत कावराबांध, झालिया, धानोली, नवेगाव, सोनपुरी परिसरात विद्युत पूरवठा करण्यात येते. परिसरातील गावांना वेगवेगळ्या फिडरमध्ये विभाजित करण्यात आले असून त्या फिडरअंतर्गत एकूण गावाची वीज खपत व त्यानुसार रक्कम वसुलीचे प्रमाण पाहून भारनियमन ठरविले जाते. ग्रामीण भागामध्ये अनेक लोक असे आहेत की ते नियमानुसार मीटर न लावता रोज आकडा टाकून वीज चोरी करतात. तसेच चोरीच्या विजेद्वारे अनेक विद्युतवर चालणार्‍या सोयीसुविधांचा उपयोग करतात. तर काही प्रामाणिक ग्राहक नियमानुसार मीटर लावून वीज वापर करतात. परंतु वीज चोरीचा परिणाम मीटर धारकांवर पडतो व त्यांना अधिक रक्कम भरावी लागते. काही गावात मीटर कमी असून वीज जास्त खपत केली जाते. परंतु काही गावात मीटरचे प्रमाण जास्त असून विजेची खपत कमी होते. परंतु फिडरमध्ये विभागणी केल्याने अशा दोन्ही गावांना एकाच पारड्यात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नियमित ग्राहकांनासुद्धा भारनियमनाचा जबरदस्त फटका बसत आहे. कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत पाच वॉर्डाचा समावेश असून पाच टोल्यांचा येथे समावेश करण्यात आला आहे. परंतु कावराबांधच्या वॉर्ड- १ आणि २, कावराबांध, मोहाटोला येथे एकही भारनियमन नाही तर वॉर्ड- ३, ४ व ५ मध्ये कुणबीटोला, गोवारीटोला, ब्राम्हणटोला येथे दररोज फक्त अडीच तास वीज पूरवठा होत असून दिवसभर ९ ते १0 तास भारनियमन सुरू आहे. त्यामुळे गोवारीटोला येथील नागरिक, दुकानदार, कारखानदार, व्यापारी, लघू व्यावसायीक खूपच त्रस्त झाले आहेत. सध्या सर्वत्र संगणकाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे आता सामान्य लोकांचे, व्यावसायिकांचे, कर्मचारी वर्गांंंचे किंवा कार्यालयांचे काम विद्युतअभावी होवू शकत नाही. एखाद्या महत्वाच्या दिवशी लोक भारनियमन बंद करण्याची विनवणी करुनसुद्धा काही तासासाठीसुद्धा भारनियमन थांबविण्यात येत नाही. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात मतदानाच्या दिवशी व मतगणनेच्या दिवशीसुद्धा भारनियमन सुरुच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सामान्य मानसापासून अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणा व निर्दयीपणामुळे कावराबांध, सोनपुरी, नवेगाव परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. सध्या जून महिना सुरू असून तापमान वाढला आहे. त्यामुळे  प्रचंड उकाळा सुरू आहे. अशात विद्युत भारनियमन होत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. लोकांचा राग अनावर झाल्यास अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही. भारनियमन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)