शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: June 9, 2014 23:43 IST

तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या

सालेकसा : तालुक्यातील कावराबांध येथे ३३ के.व्ही. उपकेंद्र असून या उपकेंद्रातून कावराबांध येथील अध्र्या गावाला भारनियमन  १0 तास तर अध्र्या गावाला एकही भारनियमन नाही. त्यामुळे भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या लोकांत कमालीचा संताप पसरला आहे. विद्युत कार्यालयात वारंवार निवेदन करूनसुद्धा भारनियमनाबद्दल एकसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला जात नसल्याचे दिसून येत आहे.कावराबांध येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रामार्फत कावराबांध, झालिया, धानोली, नवेगाव, सोनपुरी परिसरात विद्युत पूरवठा करण्यात येते. परिसरातील गावांना वेगवेगळ्या फिडरमध्ये विभाजित करण्यात आले असून त्या फिडरअंतर्गत एकूण गावाची वीज खपत व त्यानुसार रक्कम वसुलीचे प्रमाण पाहून भारनियमन ठरविले जाते. ग्रामीण भागामध्ये अनेक लोक असे आहेत की ते नियमानुसार मीटर न लावता रोज आकडा टाकून वीज चोरी करतात. तसेच चोरीच्या विजेद्वारे अनेक विद्युतवर चालणार्‍या सोयीसुविधांचा उपयोग करतात. तर काही प्रामाणिक ग्राहक नियमानुसार मीटर लावून वीज वापर करतात. परंतु वीज चोरीचा परिणाम मीटर धारकांवर पडतो व त्यांना अधिक रक्कम भरावी लागते. काही गावात मीटर कमी असून वीज जास्त खपत केली जाते. परंतु काही गावात मीटरचे प्रमाण जास्त असून विजेची खपत कमी होते. परंतु फिडरमध्ये विभागणी केल्याने अशा दोन्ही गावांना एकाच पारड्यात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नियमित ग्राहकांनासुद्धा भारनियमनाचा जबरदस्त फटका बसत आहे. कावराबांध ग्रामपंचायत अंतर्गत पाच वॉर्डाचा समावेश असून पाच टोल्यांचा येथे समावेश करण्यात आला आहे. परंतु कावराबांधच्या वॉर्ड- १ आणि २, कावराबांध, मोहाटोला येथे एकही भारनियमन नाही तर वॉर्ड- ३, ४ व ५ मध्ये कुणबीटोला, गोवारीटोला, ब्राम्हणटोला येथे दररोज फक्त अडीच तास वीज पूरवठा होत असून दिवसभर ९ ते १0 तास भारनियमन सुरू आहे. त्यामुळे गोवारीटोला येथील नागरिक, दुकानदार, कारखानदार, व्यापारी, लघू व्यावसायीक खूपच त्रस्त झाले आहेत. सध्या सर्वत्र संगणकाचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे आता सामान्य लोकांचे, व्यावसायिकांचे, कर्मचारी वर्गांंंचे किंवा कार्यालयांचे काम विद्युतअभावी होवू शकत नाही. एखाद्या महत्वाच्या दिवशी लोक भारनियमन बंद करण्याची विनवणी करुनसुद्धा काही तासासाठीसुद्धा भारनियमन थांबविण्यात येत नाही. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. यात मतदानाच्या दिवशी व मतगणनेच्या दिवशीसुद्धा भारनियमन सुरुच ठेवण्यात आले होते. त्यामुळे सामान्य मानसापासून अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागला. विद्युत विभागाच्या निष्काळजीपणा व निर्दयीपणामुळे कावराबांध, सोनपुरी, नवेगाव परिसरातील लोक त्रस्त झाले आहेत. सध्या जून महिना सुरू असून तापमान वाढला आहे. त्यामुळे  प्रचंड उकाळा सुरू आहे. अशात विद्युत भारनियमन होत असल्याने लोक त्रस्त झाले आहेत. लोकांचा राग अनावर झाल्यास अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही. भारनियमन बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. (प्रतिनिधी)