शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

४५ दिवसानंतर उघडली शहरातील बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जीवनावश्क वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने मागील ४५ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये सुध्दा काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण होते. दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाकडून कधी ग्रीन सिग्नल मिळते याकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या.

ठळक मुद्देरस्त्यांवर वाढली वर्दळ : सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य, व्यावसायिकांमध्ये उत्साह, तीन दिवस सुरू राहणार दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. याच अंतर्गंत आठवड्यातून बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे तीन दिवस काही दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. या आदेशानुसार तब्बल ४५ दिवसांच्या कालावधीनंतर शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठ बुधवारी (दि.६) उघडली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर आणि बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ होती.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जीवनावश्क वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने मागील ४५ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये सुध्दा काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण होते. दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाकडून कधी ग्रीन सिग्नल मिळते याकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर केंद्र सरकारने विविध जिल्ह्यांचे रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभाजन केले. ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये व्यवहार सुरू करण्यास काही प्रमाणात शिथिलता देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागातील व्यावसायीक प्रतिष्ठाने उघडण्यास तीन दिवसांकरिता परवानगी दिली आहे. त्यामुळे बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. बुधवारी सकाळी ८ वाजतपासून शहरातील बाजारपेठ उघडली. कापड, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रानिकसह इतर वस्तूंची दुकाने उघडली. तर सलून व स्पॉ व मद्य विक्रीची दुकाने उघडण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नव्हती. दुकानांमध्ये गर्दी होणार नाही यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दुकानांसमोर वर्तुळ आखण्यात आले होते.तसेच प्रत्येक दुकानांसमोर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. तब्बल ४५ दिवसांच्या कालावधीनंतर दुकाने उघडल्याने ग्राहकांची सुध्दा काही प्रमाणात रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. तर सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत तीन दिवस दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्याने व्यावसायीकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहयला मिळाले.गर्दीमुळे वाढला धोकाजिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील काही दुकाने वगळता तीन दिवस बाजारपेठ उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत शहरातील बाजारपेठेतील दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, नेहरु पुतळा, नगर परिषद या परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग सुध्दा न पाळल्याने कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.पोलिसांची नजरजिल्हा प्रशासनाने शहरातील व्यावसायीक प्रतिष्ठाने आठवड्यात तीन दिवस सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या कालावधीत दुकानांमध्ये गर्दी होवून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व व्यावसायीकांना सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानांसमोर वर्तुळ आखण्याचे आणि सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन केले जावे यासाठी पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले असून ते यावर नजर ठेवून होते. शिवाय व्यावसायीकांना लाऊड स्पिकरवरुन सूचना देत होते.

टॅग्स :Marketबाजार