शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

सोडले रेल्वेसाठी अन् मिळाले शहराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:23 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली.

ठळक मुद्देपुजारीटोला जलाशयाचे पाणी : पाणी टंचाईवर उपाय योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली. एकंदरीत सोडले रेल्वेसाठी आणि मिळाले शहराला असे चित्र निर्माण झाले.येथील रेल्वे स्थानकाला बिरसोला जवळील बाघ नदीतून पाणी पुरवठा होतो. तर शहराला बिरसोला पासून सुमारे २० किमी. अंतरावरील डांर्गोली येथून पाणी पुरवठा होतो. बिरसोला येथे बाघ व वैनगंगा नदीचे संगम असून पुढे बाघ नदी वैनगंगाच्या नावाने ओळखली जाते. रखरखत्या उन्हामुळे सध्या बाघ नदी आटली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. अशात पुजारीटोला प्रकल्पातून बिरसोलासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी बिरसोला येथे पोहचते. हेच पाणी पुढे डांर्गोलीपर्यंत जात असल्याची माहिती आहे. डांर्गोली जवळील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून येथूनच १७ किमी अंतरावरील गोंदिया शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीचे पात्र यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. यावर मात करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने सिंचन विभागाच्या मदतीने शहरापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणी टंचाईवर मात केली. पुजारीटोला प्रकल्पातून आतापर्यंत दोन वेळा डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा १ जून रोजी सकाळी ८ वाजता तिसऱ्यांदा पाणी सोडले जाणार होते. मात्र डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आता तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले आहे.गुरूवारी (दि.३०) डांर्गोली जवळील वैनगंगा नदीतील विहिरीत १०० सेमी पाणी उरले होते. मात्र शुक्रवारी (दि.३१) सकाळी पाण्याची पातळी पाहली असता १३२ सेमी पाणी त्यात होते. एका दिवसात ३२ सेमी पाणी वाढल्याने हे पाणी बिरसोला येथून आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच आता आणखी पातळी वाढण्याचा अंदाज आहे.१ जूनपासून पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बिसेन यांना सांगीतले होते. मात्र आता पाच-सहा दिवस पुरेल ऐवढा पाणीसाठा असल्याने पुजारीटोलाचे पाणी सोडू नये असे सिंचन विभागाला कळविले आहे.-राजेंद्र मडके,उप विभागीय अभियंता, मजिप्रा, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई