शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

सोडले रेल्वेसाठी अन् मिळाले शहराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:23 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली.

ठळक मुद्देपुजारीटोला जलाशयाचे पाणी : पाणी टंचाईवर उपाय योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली. एकंदरीत सोडले रेल्वेसाठी आणि मिळाले शहराला असे चित्र निर्माण झाले.येथील रेल्वे स्थानकाला बिरसोला जवळील बाघ नदीतून पाणी पुरवठा होतो. तर शहराला बिरसोला पासून सुमारे २० किमी. अंतरावरील डांर्गोली येथून पाणी पुरवठा होतो. बिरसोला येथे बाघ व वैनगंगा नदीचे संगम असून पुढे बाघ नदी वैनगंगाच्या नावाने ओळखली जाते. रखरखत्या उन्हामुळे सध्या बाघ नदी आटली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. अशात पुजारीटोला प्रकल्पातून बिरसोलासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी बिरसोला येथे पोहचते. हेच पाणी पुढे डांर्गोलीपर्यंत जात असल्याची माहिती आहे. डांर्गोली जवळील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून येथूनच १७ किमी अंतरावरील गोंदिया शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीचे पात्र यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. यावर मात करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने सिंचन विभागाच्या मदतीने शहरापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणी टंचाईवर मात केली. पुजारीटोला प्रकल्पातून आतापर्यंत दोन वेळा डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा १ जून रोजी सकाळी ८ वाजता तिसऱ्यांदा पाणी सोडले जाणार होते. मात्र डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आता तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले आहे.गुरूवारी (दि.३०) डांर्गोली जवळील वैनगंगा नदीतील विहिरीत १०० सेमी पाणी उरले होते. मात्र शुक्रवारी (दि.३१) सकाळी पाण्याची पातळी पाहली असता १३२ सेमी पाणी त्यात होते. एका दिवसात ३२ सेमी पाणी वाढल्याने हे पाणी बिरसोला येथून आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच आता आणखी पातळी वाढण्याचा अंदाज आहे.१ जूनपासून पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बिसेन यांना सांगीतले होते. मात्र आता पाच-सहा दिवस पुरेल ऐवढा पाणीसाठा असल्याने पुजारीटोलाचे पाणी सोडू नये असे सिंचन विभागाला कळविले आहे.-राजेंद्र मडके,उप विभागीय अभियंता, मजिप्रा, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई