शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

सोडले रेल्वेसाठी अन् मिळाले शहराला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:23 IST

येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली.

ठळक मुद्देपुजारीटोला जलाशयाचे पाणी : पाणी टंचाईवर उपाय योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील रेल्वे स्थानक आणि रेल्वे कर्मचारी वसाहतीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने बिरसोला येथील वाघ नदीच्या पात्रात पुजारीटोला जलाशयाचे पाणी सोडण्यात आले. यामुळे या दोन्ही ठिकाणी पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले. मात्र बाघ नदीत सोडलेले पाणी पाणी पुढे वैनगंगा नदीपात्रातून डांर्गोलीपर्यंत वाहून गेल्याने पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींची पातळी वाढली. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यास मदत झाली. एकंदरीत सोडले रेल्वेसाठी आणि मिळाले शहराला असे चित्र निर्माण झाले.येथील रेल्वे स्थानकाला बिरसोला जवळील बाघ नदीतून पाणी पुरवठा होतो. तर शहराला बिरसोला पासून सुमारे २० किमी. अंतरावरील डांर्गोली येथून पाणी पुरवठा होतो. बिरसोला येथे बाघ व वैनगंगा नदीचे संगम असून पुढे बाघ नदी वैनगंगाच्या नावाने ओळखली जाते. रखरखत्या उन्हामुळे सध्या बाघ नदी आटली आहे. यामुळे रेल्वे स्थानकाला पाणी पुरवठा करणे अडचणीचे ठरत आहे. अशात पुजारीटोला प्रकल्पातून बिरसोलासाठी पाणी सोडण्यात आले आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी बिरसोला येथे पोहचते. हेच पाणी पुढे डांर्गोलीपर्यंत जात असल्याची माहिती आहे. डांर्गोली जवळील वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून येथूनच १७ किमी अंतरावरील गोंदिया शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र वैनगंगा नदीचे पात्र यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडले.त्यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली होती. यावर मात करण्यासाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने सिंचन विभागाच्या मदतीने शहरापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणाचे पाणी आणून पाणी टंचाईवर मात केली. पुजारीटोला प्रकल्पातून आतापर्यंत दोन वेळा डांर्गोली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा १ जून रोजी सकाळी ८ वाजता तिसऱ्यांदा पाणी सोडले जाणार होते. मात्र डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने आता तिसऱ्यांदा पाणी सोडण्याचे थांबविण्यात आले आहे.गुरूवारी (दि.३०) डांर्गोली जवळील वैनगंगा नदीतील विहिरीत १०० सेमी पाणी उरले होते. मात्र शुक्रवारी (दि.३१) सकाळी पाण्याची पातळी पाहली असता १३२ सेमी पाणी त्यात होते. एका दिवसात ३२ सेमी पाणी वाढल्याने हे पाणी बिरसोला येथून आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच आता आणखी पातळी वाढण्याचा अंदाज आहे.१ जूनपासून पुजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाचे उपअभियंता बिसेन यांना सांगीतले होते. मात्र आता पाच-सहा दिवस पुरेल ऐवढा पाणीसाठा असल्याने पुजारीटोलाचे पाणी सोडू नये असे सिंचन विभागाला कळविले आहे.-राजेंद्र मडके,उप विभागीय अभियंता, मजिप्रा, गोंदिया

टॅग्स :water shortageपाणीटंचाई