शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी न घाबरता पुढे यावे

By admin | Updated: December 6, 2014 22:50 IST

समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन आले काम करवून घेण्याची एक परंपराच झाली आहे. कायद्याच्या भाषेत मात्र हा व्यवहार भ्रष्टाचार समजला जातो. समाजात एका रोगाप्रमाणे फोफावत असलेल्या या भ्रष्टाचाररूपी

दिनकर ठोसरे : सतर्कतेमुळेच कारवायांत वाढगोंदिया : समोरच्या व्यक्तीला पैसे देऊन आले काम करवून घेण्याची एक परंपराच झाली आहे. कायद्याच्या भाषेत मात्र हा व्यवहार भ्रष्टाचार समजला जातो. समाजात एका रोगाप्रमाणे फोफावत असलेल्या या भ्रष्टाचाररूपी रोगावर आळा घालण्याची जबाबदारी शासनाने आमच्यावर टाकली आहे. मात्र यात नागरिकांच्या सहकार्याशिवाय काहीच करू शकत नाही. नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन भ्रष्टाचाराच्या या रोगाचा नायनाट करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे यांनी केले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.जिल्ह्यात सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाया दिवसागणिक वाढत आहेत. मागील चार वर्षांत जे घडले नाही ते या वर्षात विभागाकडून केले जात आहे. याला विभागाच्या कारवाया म्हणाव्या की नागरिकांचा पुढाकार हे जाणून घेण्यासाठी विभागाकडून करण्यात येणारे प्रयत्न हे जाणून घेण्यासाठी लोकमतने ठोसरे यांच्याशी केलेली बातचीत त्यांच्यात शब्दांत...जिल्ह्यात आतापर्यंत एसीबीच्या कारवाया किती झाल्या?-सन २००९ पासून जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू झाले आहे. तेव्हापासून या विभागाने आतापर्यंत ३८ कारवाया केल्या आहेत. यात सन २०१० मध्ये एक, २०११ मध्ये पाच, २०१२ मध्ये तीन, २०१३ मध्ये चार व २०१४ मध्ये आतापर्यंत २५ कारवाया झाल्या आहेत. मागील चार वर्षांत केलेल्या कारवायांत सर्वाधिक कारवाया महसूल विभागातील आहेत. या वर्षातही करण्यात आलेल्या कारवायात सर्वाधिक पाच कारवाया महसूल विभागाच्याच आहेत. कारवायांचे प्रमाण अचानक वाढण्यामागचे कारण काय?- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यात सुरू केलेला १०६४ टोल फ्री क्रमांक हे यामागील कारण असू शकते. शिवाय एसीबीकडून लोकांना त्यांचे काम करून देण्याची हमी दिली जाते. कारवाईनंतरही सतत तक्रारदाराच्या आम्ही संपर्कात राहतो व त्यांचे मनोधैर्य खचणार याची काळजी घेतो. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भिती कमी होत असून ते पुढे येत आहेत. विभागही सतत त्यांच्या पाढीशी उभा राहणार आहे.लोकांच्या तक्रारी वाढविण्यासाठी विभागाकडून कोणते प्रयत्न केले जातात?- यासाठी जास्तीत जास्त जनसंपर्क वाढविला जात आहे. तसेच सर्वच कार्यालयांत विभागाच्या टोल फ्री क्रमांकाच्या माहितीसाठी फ्लेक्स लावले आहेत. पेट्रोल पंप, बसस्थानकांसारख्या गर्दीच्या व सार्वजनिक स्थळांवर स्टीकर्स लावण्यात आले आहेत. जवळील ग्राम कामठा येथील ग्राम पंचायत कार्यालयात बैठक घेतली. सध्या सुरू असलेल्या लहरीबाबांच्या उत्सवातही जनतेच्या माहितीस्तव फ्लेक्स लावण्यात आले आहेत. याचप्रकारे सार्वजनिक उत्सवांत फ्लेक्स लावले जातात. त्यामुळे लोकांना याबद्दलची माहिती मिळते. आता प्रत्येकाकडे मोबाईल आल्यामुळे लोक लगेच त्या नंबरवर संपर्क करतात.आतापर्यंत किती रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे?- एसीबीने आतापर्यंत एकूण ३८ कारवाया केल्या आहेत. यामध्ये सुमारे दीड कोटींची मालमत्ता विभागाने जप्त केली आहे. प्रकरणे निकाली निघण्याचे आणि न्यायप्रविष्ठ असण्याचे प्रमाण किती आहे?- विभागाने आतापर्यंत केलेल्या कारवायांतील २३ प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ठ आहेत, तर तीन प्रकरणे निकाली लागली असून दोन प्रकरणे उच्च न्यायालयात सुरू आहेत. उर्वरीत प्रकरणांवर कारवाई सुरू आहे. तक्रार करण्यासाठीची प्रक्रिया काय? केवळ टोल फ्री क्रमांकावरूनही तक्रार नोंदविता येते का?- तक्रार नोंदविण्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया तर पार पाडावी लागतेच. यासाठी तक्रारदाराला कार्यालयात यावे लागते. तक्रारदार कार्यालयात आल्यावर त्यांची लेखी तक्रार व आवश्यक ती कागदोपत्री कारवाई केली जाते. शिवाय एखादी व्यक्ती कार्यालयात येण्यास असक्षम असल्यास किंवा दुर्गम भागातील असल्यास अशा परिस्थितीत विभागाकडून त्यांना जमेल ते सहकार्य केले जाते. (शहर प्रतिनिधी)