शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नागरिकांना विकासाच्या नव्या क्रांतीचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:12 IST

क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोचमार्ग, चावडी व सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम बघोली येथील विकासकामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : क्षेत्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविणे हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे निरंतर प्रयत्न सुरू आहेत. आज गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावापर्यंत पोचमार्ग, चावडी व सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार झाले आहे. कालव्यांची सफाई व बंधारे बांधकामाच्या भूमिकेमुळे क्षेत्रातील नागरिक आर्थिक विकासाच्या नव्या क्रांतीचा अनुभव घेत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम बघोली-कलारीटोला येथील जिल्हा परिषद शाळा सुरक्षाभिंत, रस्ता सिमेंटीकरण, समाज मंदिर व दोन बोअरवेल बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी, क्षेत्रातील जनतेने जो विश्वास दाखवून विधानसभेत पाठविले आहे, त्यावर खरे उतरण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वर्षी धानाचे पीक हातून जाते. यंदा मात्र कालव्यांची सफाई करून प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचले व चांगले पीक घेता आले आहे. भविष्यात तेढवा-सिवनी उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणीही बाघच्या कालव्यांत सोडून आणखीही क्षेत्राला सिंचीत करण्याचे प्रयत्न असल्याचे सांगीतले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, बाजार समिती उपसभापती धनलाल अंबुले, केशोराव मातरे, मनोज बेलवंशी, तिरधन बिसेन, नकुलप्रसाद लांजेवार, बिसराम पाचे, नरेंंद्र मेने, हेमराज दंदरे, मुकेश बिसेन, मदनलाल गडपेले, मनोहर नागवंशी यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल