शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

चिखली येथील नागरिक चार दिवसांपासून पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

सडक-अर्जुनी : गट ग्रामपंचायत चिखली व कोहळीटोलाचे मिळून ४ लाख ६७ हजार ६० रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी ...

सडक-अर्जुनी : गट ग्रामपंचायत चिखली व कोहळीटोलाचे मिळून ४ लाख ६७ हजार ६० रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

चिखली गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिखली, कोहळीटोला या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला असल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळधारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. सध्या पाण्यासाठी बोअरवेलवर गर्दी असते. पाणी नळाला केव्हाही येते किंवा येतच नाही. याकडे स्थानिक प्रशासनाचे पाणी वितरण व्यवस्थेकडे लक्ष असते काय किंवा नाही, हे देखील कळेनासे झाले आहे. दरम्यान वरिष्ठांनी लक्ष देऊन गावातील पाणी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गट ग्रामपंचायत अंधारात

येथील गट ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला असून, संपूर्ण गाव अंधारात सापडले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात साप, विंचू व कीटकांचा धोका नाकारता येत नाही.

‘वीज बिल भरणा न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. थकबाकी वसुली करून लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, चालू व थकीत पाणीपट्टीधारकांनी लवकरात लवकर पाणी कर ग्रामपंचातीमध्ये जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.

-चित्रा भेंडारकर, सरपंच, चिखली.