शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथील नागरिक चार दिवसांपासून पाण्यासाठी व्याकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

सडक-अर्जुनी : गट ग्रामपंचायत चिखली व कोहळीटोलाचे मिळून ४ लाख ६७ हजार ६० रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी ...

सडक-अर्जुनी : गट ग्रामपंचायत चिखली व कोहळीटोलाचे मिळून ४ लाख ६७ हजार ६० रुपये वीज बिल थकल्याने महावितरणने नळपाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. परिणामी, नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.

चिखली गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या चिखली, कोहळीटोला या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला असल्याने तोंडचे पाणी पळाले आहे. नियमित पाणी बिल भरणाऱ्या सर्वसामान्य नळधारक ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. सध्या पाण्यासाठी बोअरवेलवर गर्दी असते. पाणी नळाला केव्हाही येते किंवा येतच नाही. याकडे स्थानिक प्रशासनाचे पाणी वितरण व्यवस्थेकडे लक्ष असते काय किंवा नाही, हे देखील कळेनासे झाले आहे. दरम्यान वरिष्ठांनी लक्ष देऊन गावातील पाणी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गट ग्रामपंचायत अंधारात

येथील गट ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला असून, संपूर्ण गाव अंधारात सापडले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात साप, विंचू व कीटकांचा धोका नाकारता येत नाही.

‘वीज बिल भरणा न झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. थकबाकी वसुली करून लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, चालू व थकीत पाणीपट्टीधारकांनी लवकरात लवकर पाणी कर ग्रामपंचातीमध्ये जमा करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे.

-चित्रा भेंडारकर, सरपंच, चिखली.