शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

जीर्ण आवारभिंत धोकादायक

By admin | Updated: July 23, 2016 02:16 IST

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरक्षाभिंत (आवार) अगदी जीर्ण झाली असून काही ठिकाणातून ती पडली आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : केसलवाडा प्राथमिक शाळेतील प्रकार केसलवाडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरक्षाभिंत (आवार) अगदी जीर्ण झाली असून काही ठिकाणातून ती पडली आहे. या आवारभिंतीजवळ विद्यार्थी खेळतात व लघुशंका करतात. त्यामुळे एखाद्यावेळी ही सुरक्षाभिंत पडून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. ही समस्या उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. देशाचे भावी नागरिक घडविणाऱ्या शाळा अद्ययावत असणे गरजेचे आहे. शिक्षण, क्रीडा व इतर बाबींच्या सुविधांसह सुसज्ज इमारत असणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आवारभिंत नाहीत, असल्याच तर पडक्या आहेत. काही ठिकाणी छत तुटलेले आहेत तर काही ठिकाणी ते योग्यरित्या शाकारलेले नाहीत. त्यामुळे वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळते. अशा अनेक समस्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिसून येतात. अशीच एक समस्या केसलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेची असून जीर्ण आवारभिंतीमुळे विद्यार्थ्यांचे जीव कधीही संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. केसलवाडा येथील जि.प. शाळेची आवारभिंत पडलेल्या ठिकाणी काटेरी कुंपन करण्यात आले आहे. या प्राथमिक शाळेत १६२ विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. याच शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी-१ मध्ये ३० व अंगणवाडी-२ मध्ये ४० असे एकूण ६० लहान मुले शिक्षण घेत आहेत. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या जीर्ण झालेल्या, अर्धवट तुटलेल्या व अर्धवट लटकलेल्या सुरक्षा भिंतीजवळ विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य लावलेले आहेत. शाळेत हजर असलेले विद्यार्थी लघुशंका व मध्यंतरी भोजनाच्या सुटीच्या वेळी येथे खेळायला येतात. काही विद्यार्थी या सुरक्षाभिंतीजवळ उभे राहतात. अशा या जीर्ण झालेल्या व अर्धवट तुटलेल्या सुरक्षाभिंतीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने जर काही धोका झाला तर या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांना पडला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. आपल्या मुलांचा जीव धोक्यात येण्याची भीती पालकांना वाटत आहे. आपल्या मुलांचे सुंदर व उज्वल भविष्य घडवू पाहणाऱ्या या पालकांना संबंधित अधिकाऱ्यांकडून शक्य तितक्या लवकर मदतीची अपेक्षा आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर व महत्वाच्या विषयाकडे त्वरित लक्ष देवून नवीन व मजबूत सुरक्षाभिंत शक्य तितक्या लवकर बांधून द्यावे, अशी मागणी सर्व पालकांनी व गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)