शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

धान खरेदीचा तिढा सुटण्यासाठी मुख्यमंत्रीदरबारी होणार बैठक

By admin | Updated: November 6, 2014 01:55 IST

राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधल्या दिवशी (दि.३०) घाईघाईत काढण्यात आलेल्या शासन आदेशातील अटींमुळे ...

गोंदिया : राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याच्या आधल्या दिवशी (दि.३०) घाईघाईत काढण्यात आलेल्या शासन आदेशातील अटींमुळे आणि चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोदाम भाडे व खरेदी केंद्रांच्या हिशेबाअभावी यावर्षी जिल्ह्यात धान खरेदी वांद्यात आली आहे. गोदाम मालकांसह सबएजंट सहकारी संस्थांनी हात वर केल्याने यावर तोडगा काढण्यासाठी येत्या ७ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केवळ गोंदियात नाही तर धान उत्पादक जिल्हे असलेल्या पूर्व विदर्भात यावर्षी धान खरेदीची समस्या निर्माण झाली आहे. आदिवासीबहुल भागात आदिवासी विकास महामंडळांच्या खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली असली तरी बहुतांश भागातील खरेदी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनकडूनच केली जाते. फेडरेशन ही खरेदी सबएजंट म्हणून काम करणाऱ्या ठिकठिकाणच्या सहकारी संस्थांमार्फत करते. गेल्या चार वर्षात या संस्थांनी खरेदी केलेल्या धानात मिलींगमध्ये आलेली तूट शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे त्यांना नुकसान सहन करावे लागले. याशिवाय गोदाम भाडेही चुकीच्या पद्धतीने आकारल्याचे सांगून ते शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढेपर्यंत नवीन धान खरेदी करण्यास संस्था व धान साठविण्यास गोदाम मालक तयार नाहीत.शासनाने आधारभूत किमतीनुसार धान खरेदी करण्याचा आदेश काढला असला तरी जुन्या समस्या कायम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान कमी भावाने व्यापाऱ्यांच्या घशात घालावा लागत आहे. शासनाने धान खरेदीबाबत आधी आपली भूमिका स्पष्ट करावी, धानातील घट मान्य करावी, गोदामांचे भाडे वाढवावे, हमालीचा खर्च वाढवावा अशा मागण्या केल्या आहेत. यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात दि.७ ला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यात धान पट्ट्यातील आमदार, संबंधित अधिकारी, मार्केटिंग फेडरेशनचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान लवकर धान खरेदी केंद्र सुरू करा यासाठी प्रशासनाकडून मार्केटिंग फेडरेशनवर दबाव वाढविण्यात आला आहे. मार्केटिंग अधिकारी खर्चे यांनी संबंधित संस्था संचालकांना नोटीस देऊन खरीदी केंद्र शुरू करण्यास तयार आहात की नाही, याची विचारणा केली. त्यांनी सामूहिकपणे यासाठी तयार नसल्याचे पत्र दिले आहे. मात्र प्रत्येकाकडून याबाबतचे लेखी पत्र मागितले जात आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)