शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बालभारतीचा संख्या वाचनात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:53 IST

इंग्रजीत सेव्हन्टी थ्री वाचणाऱ्या विद्यार्थ्याला मराठीतील त्र्याहत्तर कळत नाही म्हणून चक्क मराठीतील संख्या वाचनाची पध्दतच बदलून टाकण्याच्या धाडसी, क्रांतीकारक व तितकाच हास्यास्पद निर्णय यावर्षी बालभारतीचे घेतला आहे.

ठळक मुद्देजोडाक्षरे गाळण्यासाठी त्र्याहत्तर होणार सत्तर तीन : वाचन सोपे करणार

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : इंग्रजीत सेव्हन्टी थ्री वाचणाऱ्या विद्यार्थ्याला मराठीतील त्र्याहत्तर कळत नाही म्हणून चक्क मराठीतील संख्या वाचनाची पध्दतच बदलून टाकण्याच्या धाडसी, क्रांतीकारक व तितकाच हास्यास्पद निर्णय यावर्षी बालभारतीचे घेतला आहे.विद्यार्थ्याना इंग्रजी संख्या वाचन व लेखन भराभरा येतात. परंतु तीच किंबहुना त्यापेक्षा लहान मराठी संख्या वाचन व लेखन करताना विद्यार्थ्याची चांगलीच दमछाक होते. म्हणून विद्यार्थ्याची ही धांदल थांबविण्यासाठी बालभारतीने यावर्षीपासून चक्क मराठी संख्या वाचन व लेखनाची पध्दतच बदलून टाकण्यात आली आहे. त्यासाठी दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात यावर्षीपासून काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.सदर बदल मराठीतील संख्या २४ ते ९९ या संख्या वाचन व लेखनात करण्यात आले आहे. यापुढे मराठीत संख्या वाचन वा लेखन करताना सत्तावीस ऐवजी वीस सात,अठ्ठावीस ऐवजी वीस आठ, पंच्याहत्तर ऐवजी सत्तर पाच, पासष्ट ऐवजी साठ पाच, त्र्यान्नव ऐवजी नव्वद तीन असे बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे बरीच जोडाक्षरे गाळली जातात आणि बोलणे व लिहीणे यांचा क्रम सारखा येतो.जसे पंचेचाळीसमध्ये आधी पाच मग चाळीस येतात परंतु ही संख्या ४५ अशी लिहीताना आधी चाळीसचा चार व नंतर पाच लिहीला जातो.शिवाय जोडाक्षरे असणारे शब्द (जसे ब्याण्णव, अठ्यान्नव, सत्याऐंशी, चौºयाहत्तर, अठ्ठेचाळीस इ.) पाठ करावे लागत नाही आणि लिहावेही लागत नाही. म्हणून यापुढे शिक्षक शिकविताना व विद्यार्थी, पालक संख्या वाचन, लेखन करताना वीस सात (२७), नव्वद आठ (९८), साठ सात (६७) असे वाचन लेखन करतील. असे कारण याबाबत बालभारतीच्या वतीने देण्यात आले आहे.दरम्यान काही विद्यार्थी आधीच परंपरागत पध्दतीने सत्तावीस, चौºयान्नव, अडुसष्ट असे शब्द शिकले असतील तर दोन्ही प्रकारचे शब्द ग्राह्य धरले जातील. शिवाय शब्दात संख्या लिहितांना विद्यार्थ्यांना नवी पध्दत सोपी वाटेल असा आशावाद बालभारतीने व्यक्त केला आहे. मराठी संख्या वाचन व लेखनाच्या या नव्या पध्दतीने वाचन इंग्रजी प्रमाणेत कानडी, तेलगू, मल्याळी, तामीळ व इतर दक्षिण भारतीय भाषांमध्ये सुध्दा केले जाते.यामुळे जोडाक्षरे कमी होऊन वाचन सोपे होते व विद्यार्थ्यात गणिताची आवड निर्माण होण्यास मदत होते, अशी पुष्टी बाल भारतीने दिली आहे.गुरुजींची होणार दमछाकशालेय जीवनात नव्यानेच आलेल्या कोरी पाटी असलेल्या विद्यार्थ्याला मराठी वाचनाची नवी पध्दत सोपी वाटणार व ते सहज आत्मसातही करतील परंतु बालपणापासून प्रदीर्घ नोकरीत पासष्ट-पंच्याहत्तर करणाºया गुरुजींची साठ पाच-सत्तर पाच करताना चांगलीच दमछाक होणार हे मात्र खरे.शिक्षणाचा विनोद होतोयबालभारतीने संख्या वाचनात केलेल्या बदल म्हणजे विद्यार्थ्याचे वाचन सोपे करणे नसून शिक्षणाचा विनोद करणे होय अशा तीव्र प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून उमटत आहेत.निरक्षरांना चौºयान्नव कळत नाही म्हणून नव्वद चार सांगणे म्हणजे विद्यार्थ्याना साक्षर नव्हे निरक्षण बनविणे आहे, हीच पध्दत यापुढे हिंदीतही वापरणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Educationशिक्षण