शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

गावातील सिमेंट रस्ते ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: May 14, 2015 00:40 IST

लाखो रुपये खर्च करून गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आलेत.

नियोजनाचा अभाव : प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ट कामनवेगावबांध : लाखो रुपये खर्च करून गावागावांमध्ये सिमेंट रस्ते तयार करण्यात आलेत. परंतु सदर रस्ते तुर्तास जरी सुंदर दिसत असले तरी ते योग्य नियोजनाअभावी ग्रामीण जनतेला धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे रस्ते लोकांच्या सोयीसाठी की गैरसोयीसाठी, असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले आहेत.गाव सुंदर दिसण्यात रस्ते व नाल्यांचे बांधकाम यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या गावातील रस्ते पक्के असावेत, अशी प्रत्येक नागरिकांची अपेक्षा असणे वास्तविक आहे. नागरिकांच्या वास्तविक अपेक्षेला मूर्त रूप देण्यासाठी गावागावांत विविध प्रकारच्या निधीतून सिमेंट रस्ते बांधण्याचा सपाटा सुरू झाला. संबंधित विभागाच्या अभियंत्याने तयार केलेल्या अंदाजपत्रकानुसार कंत्राटदार या रस्त्यांचे बांधकाम करू लागले. त्यामुळे अंदाजपत्रकातील लांबी, रुंदी आणि उंचीनुसार रस्ते तयार झालेत. परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या रस्त्याची रूंदी मात्र कुणीच लक्षात घेतलेली दिसत नाही. त्यामुळे मध्यभागी सिमेंट रस्ता आणि त्यांच्या दोन्ही बाजूला नव्वद अंशाच्या कोनामध्ये असलेले सुमारे अर्धा फूट खोल असलेले खड्डे, असेच काहीसे चित्र बहुतेक गावखेड्यांमध्ये सध्या तरी दिसून येते. त्यामुळे दुचाकी किंवा चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला गेले की अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याचबरोबर पायदळ चालताना अनवधनाने बालक, वृध्द एवढेच नव्हे तर तरूणांनादेखील या रस्त्यांनी आपला इंगा दाखविला आहे. दुरूस्ती व व्यवस्थापन खर्च मुळातच कमी लागत असल्यामुळे सिमेंट रस्त्यांना प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक स्वराज्य संस्थानी अधिक प्राधान्य दिलेले दिसून येत आहे. परंतु सिमेंट रस्ता उंच झाल्यामुळे त्याच्या दोन्ही बाजूला तयार झालेल्या खड्यांमध्ये मुरूम भरण्याचे सौजन्य मात्र कुणी सध्यातरी दाखवित नाहीत किंवा संपूर्ण रस्त्याचेच सिमेंरटीकरण करीत नाहीत. यानंतर तरी प्रशासनाने परिसरातील नागरिकांना विश्वासात घेवून परिपूर्ण रस्ते तयार करावेत. रस्ते हे सोयीचे आहेत, ते वापरणाऱ्यांच्या गैरसोईचे ठरू नयेत, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)सिमेंट रस्त्यांमुळे पाणी पातळी खालावलीसिमेंट रस्त्यामुळे ग्रामीण भागात देखील उष्णतेत वाढ झालेली आहे. पाणी मुरत नसल्यामुळे भूगभारतील पाण्याची पातळी खालावत आहे. रस्ते व्यवस्थित न बांधल्यामुळे पावसाळ्यात घसरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक ठिकाणचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे नागरिक सांगतात. एकूणच सिमेंट रस्त्यांची अवस्था ही ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झालेली आहे.