शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

कोमेजल्या २८१ कळ्या

By admin | Updated: February 4, 2016 01:46 IST

जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही.

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही. कुपोषणाबरोबरच इतर कारणांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या नऊ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ६६६ महिलांची प्रसूती झाली. यातील १३ हजार ६२६ महिलांची म्हणजेच ९९.७१ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली, तर फक्त ४० महिलांची प्रसुती घरी झाली आहे. एकूण प्रसूतींपैकी ३ हजार ९२७ उपकेंद्रात, २ हजार २६२ प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ६ हजार ६६२ प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्या आहेत. ७७५ प्रसुती खासगी रूग्णालयात करण्यात आल्या. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम आज गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसुती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.२.२३ टक्के नवजात बालकांचा मृत्यूमागील नऊ महिन्यात ३०५ म्हणजेच २.२३ टक्के अर्भक दगावले आहेत. यात २४६ महिलांनी जुळ्या बालकांना जन्म दिला. डिसेंबर महिन्यात १ हजार ६६९ प्रसूती झाल्या. यातील १ हजार ६६६ प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या. यात उपकेंद्र ४९०, प्राथमिक आरोग्य केंद्र २६७, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात ७५७ व खासगी रूग्णालयात १५७ खासगी रूग्णालयात प्रसूती करण्यात आली. ३ महिलांची प्रसूती घरी झाली. या महिन्यात ४१ नवजात बाळांचा जन्म झाला तर ११ जुळ््या बालकांनी जन्म घेतला.आठवडाभरात ३३.८० टक्के बालकांचा मृत्यू जिल्ह्यात ९ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला. यात १ ते ७ दिवसाच्या आत ९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ते ६ वर्षातील ३६ बालकांचा तर ६४ बालकांचा जन्म घेतल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यू झाला. ७ ते २८ दिवसात ४१, एक महिना ते १ वर्षातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात एक वर्षाच्या आत २७ बालकांचा मृत्यू झाला.रस्त्यातच तीन गर्भवतींचा मृत्यूआरोग्य विभागाने गर्भवतींना आरोग्य संस्थेत पाहेचविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली असली तरी गर्भवतींना योग्य वेळी आरोग्य संस्थेत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाची ही सेवा निष्फळ ठरत आहे. परिणामी नऊ महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. नऊ महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत गर्भवतींमध्ये ग्रामीण भागातील पाच तर शहरातील एका गर्भवतीचा समावेश आहे. एप्रिल, मे, जून व आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी तर आॅक्टोबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. दोन मातामृत्यू बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तर एक मातामृत्यू खासगी रूग्णालयात आहे.