शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कोमेजल्या २८१ कळ्या

By admin | Updated: February 4, 2016 01:46 IST

जिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही.

नरेश रहिले गोंदियाजिल्ह्यात एकीकडे रुग्णालयांमधील प्रसूतीचे प्रमाण ९९.७१ वर नेण्यात आरोग्य विभागाला यश आले असले तरी बालमृत्यूचे प्रमाण मात्र त्या प्रमाणात कमी करण्यात यश आलेले नाही. कुपोषणाबरोबरच इतर कारणांनी जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात गेल्या नऊ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सन २०१५ च्या एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ६६६ महिलांची प्रसूती झाली. यातील १३ हजार ६२६ महिलांची म्हणजेच ९९.७१ टक्के प्रसूती आरोग्य संस्थेतच करण्यात आली, तर फक्त ४० महिलांची प्रसुती घरी झाली आहे. एकूण प्रसूतींपैकी ३ हजार ९२७ उपकेंद्रात, २ हजार २६२ प्राथमिक आरोग्य केंद्रात तर ६ हजार ६६२ प्रसूती बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आल्या आहेत. ७७५ प्रसुती खासगी रूग्णालयात करण्यात आल्या. जिल्ह्यातील महिलांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने महिलांना आरोग्य संस्थेतच प्रसूती करावी असा आग्रह धरला. त्याचा परिणाम आज गोंदियासारख्या नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील महिला प्रसूतीसाठी रुग्णालयांमध्ये दाखल होतात. महिलांची आरोग्य संस्थेतच सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी शासनाने आग्रह धरला होता. यासाठी जनजागृतीही करण्यात आली. त्यामुळे महिलांची घरी प्रसुती होण्याचे प्रमाण एक टक्काही नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र आरोग्य संस्थेत दाखल होऊनही बालमृत्यू थांबविण्यात यंत्रणा अपयशी ठरली आहे.२.२३ टक्के नवजात बालकांचा मृत्यूमागील नऊ महिन्यात ३०५ म्हणजेच २.२३ टक्के अर्भक दगावले आहेत. यात २४६ महिलांनी जुळ्या बालकांना जन्म दिला. डिसेंबर महिन्यात १ हजार ६६९ प्रसूती झाल्या. यातील १ हजार ६६६ प्रसूती आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आल्या. यात उपकेंद्र ४९०, प्राथमिक आरोग्य केंद्र २६७, बाई गंगाबाई महिला रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालयात ७५७ व खासगी रूग्णालयात १५७ खासगी रूग्णालयात प्रसूती करण्यात आली. ३ महिलांची प्रसूती घरी झाली. या महिन्यात ४१ नवजात बाळांचा जन्म झाला तर ११ जुळ््या बालकांनी जन्म घेतला.आठवडाभरात ३३.८० टक्के बालकांचा मृत्यू जिल्ह्यात ९ महिन्यात २८१ बालकांचा मृत्यू झाला. यात १ ते ७ दिवसाच्या आत ९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. १ ते ६ वर्षातील ३६ बालकांचा तर ६४ बालकांचा जन्म घेतल्यानंतर २४ तासाच्या आत मृत्यू झाला. ७ ते २८ दिवसात ४१, एक महिना ते १ वर्षातील ४५ बालकांचा मृत्यू झाला. डिसेंबर महिन्यात एक वर्षाच्या आत २७ बालकांचा मृत्यू झाला.रस्त्यातच तीन गर्भवतींचा मृत्यूआरोग्य विभागाने गर्भवतींना आरोग्य संस्थेत पाहेचविण्यासाठी जननी शिशु सुरक्षा योजना अंमलात आणली असली तरी गर्भवतींना योग्य वेळी आरोग्य संस्थेत पोहचविण्यासाठी आरोग्य विभागाची ही सेवा निष्फळ ठरत आहे. परिणामी नऊ महिन्यात तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. नऊ महिन्यात सहा मातांचा मृत्यू झाला आहे. या मृत गर्भवतींमध्ये ग्रामीण भागातील पाच तर शहरातील एका गर्भवतीचा समावेश आहे. एप्रिल, मे, जून व आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी तर आॅक्टोबर महिन्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. दोन मातामृत्यू बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात तर एक मातामृत्यू खासगी रूग्णालयात आहे.