शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रेल्वेस्थानकावर केरकचरा टाकणे १३५ जणांना भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:38 IST

रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात.

ठळक मुद्दे१० दिवसांत २० लाखांचा दंड वसूल : विशेष तिकीट तपासणी अभियान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे दुर्लक्ष करणे १३५ प्रवाशांना भोवले असून त्यांना रेल्वे विभागाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. रेल्वे स्थानकावर कचरा केल्याप्रकरणी १३५ जणावर कारवाई करुन त्यांच्याकडून १२ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.रेल्वे स्थानक परिसर नीट नेटका ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकतात. अशा प्रवाशांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई केली जात आहे. याच अंतर्गंत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळातंर्गत दहा दिवस मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातून धावणाºया प्रवासी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये १९ ते २० फेब्रुवारीपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या १० दिवसांच्या अभियानात एकूण ८०६० प्रकणांची नोंद करून २०.६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दपूम रेल्वे नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाºयांच्या पुढाकारात, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने मंडळाच्या विविध लोहमार्गावरून धावणाºया एकूण ३३२ प्रवाशी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.या अंतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करता लगेज नेण्याचे ८०६० प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण २० लाख ६६ हजार १७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांनी तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने २४ फेब्रुवारीला भंडारा रोड स्थानकात किलेबंदी चेकींग केली. येथून ये-जा करणाºया २८ प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करताच लगेज नेण्याचे ८२५ प्रकरणे एकाच दिवसात नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात एक लाख ६९ हजार ७२५ रूपयांची वसूल करण्यात आला. १० दिवसांच्या विशेष तपासणी अभियानात ही वसुली सर्वाधिक ठरली.रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये यासाठी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन दपूम रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी केले आहे.