शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

रेल्वेस्थानकावर केरकचरा टाकणे १३५ जणांना भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:38 IST

रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात.

ठळक मुद्दे१० दिवसांत २० लाखांचा दंड वसूल : विशेष तिकीट तपासणी अभियान

ऑनलाईन लोकमतगोंदिया : रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकणाऱ्या दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र हे दुर्लक्ष करणे १३५ प्रवाशांना भोवले असून त्यांना रेल्वे विभागाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. रेल्वे स्थानकावर कचरा केल्याप्रकरणी १३५ जणावर कारवाई करुन त्यांच्याकडून १२ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे प्रवाशांचे धाबे दणाणले आहे.रेल्वे स्थानक परिसर नीट नेटका ठेवण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. मात्र यानंतरही बरेच प्रवाशी रेल्वे स्थानकावर केरकचरा टाकतात. अशा प्रवाशांवर नजर ठेवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई कारवाई केली जात आहे. याच अंतर्गंत दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मंडळातंर्गत दहा दिवस मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर मंडळातून धावणाºया प्रवासी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये १९ ते २० फेब्रुवारीपर्यंत विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. या १० दिवसांच्या अभियानात एकूण ८०६० प्रकणांची नोंद करून २०.६६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.दपूम रेल्वे नागपूर मंडळाद्वारे वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल यांच्या नेतृत्वात, वाणिज्य विभागाच्या अधिकाºयांच्या पुढाकारात, तिकीट निरीक्षक, वाणिज्य निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने मंडळाच्या विविध लोहमार्गावरून धावणाºया एकूण ३३२ प्रवाशी गाड्या व मुख्य स्थानकांमध्ये विविध विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले.या अंतर्गत विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करता लगेज नेण्याचे ८०६० प्रकरणे नोंद करण्यात आले. त्यांच्याकडून एकूण २० लाख ६६ हजार १७० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.सहायक मंडळ वाणिज्य व्यवस्थापक ओ.पी. जायस्वाल यांनी तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलाच्या सहकार्याने २४ फेब्रुवारीला भंडारा रोड स्थानकात किलेबंदी चेकींग केली. येथून ये-जा करणाºया २८ प्रवासी गाड्यांमध्ये विनातिकीट/अनियमित प्रवास तसेच माल बुक न करताच लगेज नेण्याचे ८२५ प्रकरणे एकाच दिवसात नोंदविण्यात आले. त्यांच्याकडून दंडस्वरूपात एक लाख ६९ हजार ७२५ रूपयांची वसूल करण्यात आला. १० दिवसांच्या विशेष तपासणी अभियानात ही वसुली सर्वाधिक ठरली.रेल्वे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची असुविधा होवू नये यासाठी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, असे आवाहन दपूम रेल्वे नागपूरचे मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांनी केले आहे.