शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

अभियानातून कार्यक्षमता वाढविणार

By admin | Updated: December 27, 2014 22:53 IST

आजही परिसरातील जमिनीची सुपीकता पूर्णत्वाकडे नाही. एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्याकरिता शासनाने कोरडवाहू

काचेवानी : आजही परिसरातील जमिनीची सुपीकता पूर्णत्वाकडे नाही. एकूण क्षेत्राच्या ४५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढविण्याकरिता शासनाने कोरडवाहू अभियान सुरू केला आहे. हे अभियान तिरोडा तालुक्यात केवळ एका गावापुरते मर्यादित न ठेवता सर्व महसूल मंडळात म्हणजे चार ते पाच ठिकाणी हे अभियान राबविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. २०१४-१५ पासून २०१७ पर्यंत कोरडवाहू शाश्वत शेती कार्यक्रमाऐवजी कोरडवाहू शेती अभियान सुरु केले आहे. या अभियानात तालुक्यातून केवळ एका गावाची निवड करुन या गावात प्रात्यक्षिकातून सुधारित शेती केली जात आहे. परंतु संपूर्ण तालुक्यातून एकच गाव असल्याने या अभियानाचा लाभ फारसा होणार नाही. या अभियानाला यशस्वी करायचे असेल तर तालुक्याच्या राजस्व मंडळ क्षेत्रात हे अभियान राबविणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांनी लोकमतजवळ बोलून दाखविले आहे. कोरडवाहू शेती अभियानाच्या प्रमुख उद्देश म्हणजे कोरडवाहू शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे, मृद जलसंधारणासह साखळी बंधारे व शेततळी या माध्यमातून सरंक्षित सिंचनाच्या सुविधा पुरविणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर करून सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे, यांत्रिकीकरणारव्दारे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे, शेतमालास योग्य भाव मिळण्याकरिता नियंत्रित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन सुविधा निर्माण करणे, तंत्रज्ञानाने पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मनुष्यबळाचा प्रचार व प्रसार करणे आणि प्रशिक्षण, शेतीशाळा, अभ्यास दौरे या माध्यमातून मनुष्यबळाचे सक्षमीकरण करणे आहेत. शेतकऱ्यांची आजही स्थिती दयनिय आहे. कितीतरी वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकार विविध योजनांची आखणी करून सुविधा उपलब्ध करीत आहे. तरीही शेतकऱ्यांची अवस्था हवी तशी सुधारली नाही. यात काही प्रमाणात शेतकरी, शासन आणि योजना राबविणारी यंत्रणा जबाबदार असल्याचे शेतकरी बोलतात. शासन योजना तयार करते मात्र योजना तयार करतेवेळी कृषी विभाग शासनाला योग्य सल्ला देत नाही. अर्थात योजना तुटक स्वरूपात राबविल्या जातात. त्यामुळे शेतकरी त्या पूर्ण करू शकत नसल्याचे बोलले जाते.शेतकऱ्यांना एवढी वेळ आणि पैसा नाही की दूर अंतरावर जाऊन प्रात्यक्षिकांचे अवलोकन करू शकेल. कृषी विभागाकडे योजना आल्या, त्यातून कितीतरी योजना किंवा निधीतील रक्कम कोणत्या ना कोणत्या स्वरुपातून आपल्या घशात घातली जाते, अशा विविध समस्या आहेत. यातून शेतकऱ्यांचा लाभ कमी तर अधिकाऱ्यांचा लाभ अधिक होतो. लाखो शेतकरी भोळेभाळे व अशिक्षित किंवा असतात. याचा लाभ सर्वच अधिकारी, कर्मचारी आणि नेतेमंडळी घेत आहेत.तालुक्यात एका गावात कोरडवाहू शेती अभियान राबवल्याने भागणार नाही तर चार ते पाच गावात अभियान राबवायला हवे, असे प्रगत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजही शेतकऱ्यांना शेती करण्यायोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. जमिनीचे व त्यातील सुविधेचे प्रमाण पाहिल्यास शेतकऱ्यांना राबविण्यात येणाऱ्या अभियानाची गती वाढविण्याची गरज आहे. याकरिता तालुक्यात एका गावात नाही तर २० ते २५ गावात हे अभियान राबविल्यावरच शेतकऱ्यांच्या विकासात गती येण्याची शक्यता आहे. अन्यथा या योजना आणि अभियान फोल ठरणार, हे नाकारता येणार नाही. या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधी, यंत्र, पॅक हाऊस, ताडपत्री यासह अनेक साहित्य स्वस्त दरात उपलब्ध केल्या जातात. मात्र वेळेवर शेतकऱ्यांजवळ पैसे नसल्याने किंवा मोफत मिळायला हवे या उद्देशाने घेतल्या जात नाहीत.