शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या गर्दीने बसस्थानके फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:00 IST

दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बसस्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे.

ठळक मुद्देआली दिवाळी : रेल्वेगाड्यासुद्धा धावताहेत हाऊसफुल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाºया प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने शहरातील राज्य परिवहन महामंडळाची बसस्थानके फुलू लागली आहेत. रेल्वे स्टेशन व बसस्थानकांवर प्रवाशांची सकाळपासूनच गर्दी होत आहे. त्यानुसार एस.टी. प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्यांची व्यवस्थाही केली आहे.दिवाळीपूर्वी येणाºया व सण आटोपून परत जाणाºयांची संख्याही जास्त आहे. बाहेरगावाहून गोंदिया येथे कामानिमित्त आलेल्या चाकरमान्यांना गावी जाण्याचे वेध लागले आहे. मुलांच्या सत्र परीक्षाही संपल्या आहेत. दुसरीकडे दिवाळीनिमित्त शाळांना सुट्या लागल्या आहेत. परिणामी मागील तीन दिवसांपासून बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे.सकाळपासून विविध मार्गावर जाणाºया बसेससाठी प्रवाशांचा ओघ सुरु होता. काही ठिकाणी तिकिटांसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. त्यातच काही बस उशीरा येत असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. गोंदिया बसस्थानकावरून अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा यासह जिल्ह्यांतर्गत ग्रामीण भागात जाणाºया गाड्यांमध्ये प्रवासी खच्चून बसल्याचे तथा उभे असल्याचे दिसून येत आहे.दिवाळी हा मुख्य सण असल्याने गावाकडे जाणाºयांची संख्या या दिवसात वाढते. त्यामुळे आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. नेहमीपेक्षा रविवारी बसस्थानकावर गर्दी जास्त होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गोंदिया आगाराच्यावतीने जादा बस गाड्या सोडण्यात येत आहेत. गर्दीमुळे सामान व लहान मुलांना सांभाळताना प्रवाशांची कसरत होत आहे. ज्या मार्गावर अधिक गर्दी आहे तेथे रापच्यावतीने तातडीने बस उपलब्ध करून दिली जात आहे.रेल्वेगाड्या धावताहेत भरभरूनदिवाळीनिमित्त स्वगावी जाणाºया प्रवाशांमुळे प्रवाशी रेल्वेगाड्या भरभरून धावत आहेत. रविवारी (दि.१५) मुंबईवरून गोंदियाला येणाºया विदर्भ एक्स्प्रेसच्या साधारण डब्यांमध्ये पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांनी सामान्य तिकिट घेवून आरक्षित डब्यांतून प्रवास केला. त्यामुळे रेल्वे कर्मचाºयांनी त्यांच्याकडून प्रत्येकी १०० रूपयांचा दंडही वसूल केला. प्रवाशांनीही सदर दंडाची रक्कम देवून आरक्षित डब्यांमध्येच बसून गोंदियापर्यंत प्रवास केला. अशा गर्दीच्या परिस्थितीत रेल्वे कर्मचाºयांकडून प्रवाशांची लूट केली जात असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे.