शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

फुटला अश्रूंचा बांध, आता धैर्याने जगण्याचा निर्धार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : कुणी तरुण तर कुणी चिल्यापिल्यांना सोडून गेले. ज्या नेमक्या उमेदीच्या वयात पोटच्या गोळ्यांना रोजगाराभिमुख ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : कुणी तरुण तर कुणी चिल्यापिल्यांना सोडून गेले. ज्या नेमक्या उमेदीच्या वयात पोटच्या गोळ्यांना रोजगाराभिमुख करायचे होते. कुणाचे हात पिवळे करायचे होते, तर कुणाचे बोट हातात घेऊन चालवायला शिकवायचे होते. नेमक्या त्याच वेळात कोरोनारूपी काळाने त्यांच्यावर झडप घातली. रथाच्या दोन चाकांपैकी एक चाक गळून पडले. आता एका चाकावरच रथ हाकायचा आहे; पण आम्ही न डगमगता पुढे जाणार असे बळ, आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. खरंच प्रशासनाचे हे सकारात्मक पाऊल निश्चितच प्रेरणादायी आहे.

प्रशासनाचा कारभार म्हटला की अधिकारी, कर्मचाऱ्यांतील बरबटपणा, मरगळ, लाचेची मागणी, जनतेची ससेहोलपट हेच चित्र नजरेसमोर उभे राहते; परंतु प्रशासनातही काही लोक कर्तव्यतत्पर असतात हेसुद्धा तेवढंच खरं आहे. याचं ज्वलंत वास्तव कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना मदत करतेवेळी आली. गोंदियाचे प्रभारी जिल्हाधिकारी राजेश खवले व अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम हे आपल्या सहकाऱ्यांसह मदत व सांत्वना भेट देण्यासाठी झटताना दिसत आहेत.

कोरोनात अनेकांनी आपले मातृ-पितृ, वडीलधारी माणसं गमावली. कुणाच्या डोक्यावरचे छत्र हरपले, तर कुणी निराधार झाले. दुःख तर अपार आहे, त्याची भरपाई या जन्मात होणे कदापि शक्य नाही; पण पुढचं आयुष्य व्यतित करताना अन्नधान्यासाठी कुणासमोरही मृतकांच्या वारसांना पदर पसरण्याची वेळ येऊ नये याची व्यवस्था प्रशासनाने केली.

.......

अन्नदाता सुखी भवचे दर्शन

अन्नदाता सुखी भव, असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. या उक्तीचं दर्शन यातून घडताना दिसते. कौतुक या गोष्टीचं आहे, की कोणत्याही कामासाठी सामान्य माणसाला प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागतात, तरीसुद्धा वेळेवर कामे होत नाहीत. अनेक कागदं रंगवावी लागतात; पण तहसीलदार मेश्राम व त्यांच्या चमूने मृतकांच्या घरी जाऊन विशेष सहाय्य योजनेंतर्गत इंदिरा गांधी निराधार, कुटुंब साहाय्य योजनेंतर्गत आर्थिक मदत, विधवा योजनेंतर्गतची आवेदन पत्र भरून आणले. अंत्योदय योजनेंतर्गत महिन्याला ३५ किलो मोफत अन्नधान्य देण्याचे रेशन कार्ड घरी पोहचवून दिले. शिवाय विधवा महिलांना बहीण मानून साडी-चोळी व मुलांना ड्रेस भेट म्हणून दिला.

......

अनेक कुटुंबे आर्थिक संकटात

कोरोनापीडित कुटुंबे आर्थिक संकटात आहेत. राजोली येथील एका विधवेचे वय २८ वर्षे आहे. दोन मुले असून त्यांचे वय अवघे ५ व ९ वर्षांचे आहे. याच गावातील एका कुटुंबात आई-वडील नाहीत. दोन्ही १६ व २१ वर्षांच्या मुलीच आहेत. मोरगाव येथील कमावता पुरुष गेला. ३२ वर्षांची पत्नी व १० वर्षांचा मुलगा आहे. खामखुरा येथील एका कुटुंबातील कर्ता पुरुष दगावला. ३० वर्षांची पत्नी व केवळ २ वर्षांचा चिमुकला आहे. सोबत वृद्ध आई-वडील आहेत. निमगाव येथील ५० वर्षीय विधवेला ११ वर्षांचा मुलगा आहे. एकंदरीत सर्वांची मुलं लहानच आहेत. काहींना धड बोलताही येत नाही तर काहींचे हात पिवळे करण्याचा व रोजगाराचा प्रश्न आहे. ही सारी कुटुंबे गरीब आहेत.

........

प्राधान्याने अनुदानित बियाणे मिळणार

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणांचे सुधारित बियाणे वितरित करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्या शेतकरी कुटुंबीयांना शासन अनुदानित बियाणे प्राधान्याने देण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ९ जून रोजी झालेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीत दिले.

..................

लोकमतचे मानले आभार

कोरोनाने आधारवड हरपलेल्यांच्या व्यथा लोकमतच्या माध्यमातून सातत्याने मांडल्या जात आहे. यामुळे अनेक मदतीचे आत गरजू परिवारांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. लोकमत कार्यालयातही मदतीसाठी दररोज फोन येत आहेत. मदतीचा ओघ सुरू झाल्याने आणि लोकमतने हा मुद्दा लावून धरल्याबद्दल जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी लोकमतचे आभार मानले.