शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जलाऊ लाकडांसाठी जंगलाची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:38 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे. प्रशासन कोट्यावधीचा निधी वृक्षारोपणावर खर्च करते. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घनदाट जंगलेही आता ओसाड होत आहेत. सर्वत्र अधिकारी असूनही मात्र लाकडांची कत्तल कशी होते असा प्रश्न जनमानसांत आहे.शासनाने दोन कोटी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा विडा उचलला होता. मात्र रानामध्ये लावलेल्या वृक्षांची कत्तल होत आहे. काही ठिकाणी जंगलामध्ये लावलेली झाडे सुकून गेली. तर काही ठिकाणी फक्त खड्डे खोदल्याचे दिसत आहेत. अर्धवट काम करून पूर्ण मोबदला घेण्यात आला आहे. कागदोपत्री माहिती पूर्ण करून अधिकऱ्यांनी स्वत:चे खिसे गच्च भरल्याची चर्चा जनमानसात आहे. एकीकडे शासन दिवसेंदिवस वाढत्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी झाडांची लागवड करते, तर दुसरीकडे सरपणासाठी जंगलांची कत्तल होत आहे. झाडांची कत्तल थांबवावी म्हणून शासनाने उज्वल गॅस योजना चालू केली. मात्र गरजू व गरिबांना त्याचा पूरेपूर फायदा न मिळाल्याने आजही अनेक गरजू या योजनापासून वंचीत असल्याने स्वयंपाकासाठी जंगलांची कत्तल थांबण्याऐवजी वाढत चालली आहे.प्रशासनाने गरजू व गरीबांना उज्वला योजनापासून वंचीत न ठेवता या योजनेचा लाभ द्यावा. सरपणासाठी जंगलाची कत्तल केली जाते याकडे वनविभागाने लक्ष देऊन होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग