शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

जलाऊ लाकडांसाठी जंगलाची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:38 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यातील गाव जंगलाशी निगडीत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक स्वयंपाकासाठी लाकडाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतात. मात्र सर्वच लाकडे शेतातील असतात, असे नाही तर शेजारच्या वनाची कत्तल केली जाते. मात्र वनविभागाचे दुर्लक्ष आहे. प्रशासन कोट्यावधीचा निधी वृक्षारोपणावर खर्च करते. मात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे घनदाट जंगलेही आता ओसाड होत आहेत. सर्वत्र अधिकारी असूनही मात्र लाकडांची कत्तल कशी होते असा प्रश्न जनमानसांत आहे.शासनाने दोन कोटी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा विडा उचलला होता. मात्र रानामध्ये लावलेल्या वृक्षांची कत्तल होत आहे. काही ठिकाणी जंगलामध्ये लावलेली झाडे सुकून गेली. तर काही ठिकाणी फक्त खड्डे खोदल्याचे दिसत आहेत. अर्धवट काम करून पूर्ण मोबदला घेण्यात आला आहे. कागदोपत्री माहिती पूर्ण करून अधिकऱ्यांनी स्वत:चे खिसे गच्च भरल्याची चर्चा जनमानसात आहे. एकीकडे शासन दिवसेंदिवस वाढत्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी झाडांची लागवड करते, तर दुसरीकडे सरपणासाठी जंगलांची कत्तल होत आहे. झाडांची कत्तल थांबवावी म्हणून शासनाने उज्वल गॅस योजना चालू केली. मात्र गरजू व गरिबांना त्याचा पूरेपूर फायदा न मिळाल्याने आजही अनेक गरजू या योजनापासून वंचीत असल्याने स्वयंपाकासाठी जंगलांची कत्तल थांबण्याऐवजी वाढत चालली आहे.प्रशासनाने गरजू व गरीबांना उज्वला योजनापासून वंचीत न ठेवता या योजनेचा लाभ द्यावा. सरपणासाठी जंगलाची कत्तल केली जाते याकडे वनविभागाने लक्ष देऊन होणारी वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग