शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

तणसाचे ढीग जळून भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:01 IST

येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देजनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न : नुकसान भरपाईची शेतकऱ्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : येथील शेतकरी हऊसलाल नागपुरे यांच्या घरासमोर ठेवलेल्या तणसाच्या ढिगाला अचानक आग लागून संपूर्ण तणस भस्मसात झाला. शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली असून यात नागपुरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्याकडील जनावरांच्या चाºयाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.उन्हाळी धान पिकाची मळणी झाल्याने पावसाळ््यात जनावरांच्या चाºयाची सोय म्हणून हऊसलाल नागपुरे यांनी दुसऱ्या शेतकऱ्याकडून तीन ट्रॅक्टर तणस खरेदी केले होते. तणसाचे हे ढिगारे त्यांनी आपल्या घरासमोर अंगणात ठेवले होते. दरम्यान शुक्रवारी (दि.१) रात्री १० वाजताच्या सुमारास अचानकच तणसाच्या ढिगाला आग लागली. आगीच्या ज्वालांची धग बघून गावात एकच खळबळ माजली.यावर गावातील ताराचंद बंसोड, खुशाल शहारे, मनोज शहारे, देवराम मानवटकर, लच्छू कुरसुंगे, धनलाल नागपुरे, सुरजोती नागपुरे यांनी वामन लांजेवार यांच्या घरातील बोअरवेलचे पाणी उपसून आगीला नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीमुळे तणसाचे ढिग जळून भस्मसात झाले. यात नागपुरे यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले असून त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तणस जळून झालेल्या नुकसानाची शासनाने भरपाई देण्याची मागणी नागपुरे व गावकºयांनी केली आहे.विशेष म्हणजे, या आगीवर वेळीच पाण्याचा मार केल्याने आग पसरली नाही व अन्य अप्रिय घटना घडली नाही. कारण, तणसाचे ढिग होते तेथून थोड्याच अंतरावर नागपुरे यांचे घर आहे. तणस हलके असल्याने उडून घराकडे गेले असते तर त्यातून आग पसरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र गावकºयांनी वेळीच पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा धोका टळला.

टॅग्स :fireआग