शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा बोजा शाळांवर; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

गोंदिया : पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व परीक्षेसंबंधी साहित्य शाळांना पाठविले. शाळांमध्ये हे ...

गोंदिया : पंधरा दिवसांपूर्वी शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका व परीक्षेसंबंधी साहित्य शाळांना पाठविले. शाळांमध्ये हे साहित्य असताना ते साहित्य चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे.

बहुतेक शाळांमध्ये चौकीदार नसतात. चौकीदार ठेवण्याची तशी शासनाची तरतूदही नाही. कोरोनाच्या महामारीमध्ये ६० ते ७० टक्के कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आजघडीला आहेत. शासनाने मागच्या पाच ते दहा वर्षांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. शाळांमध्ये रात्रपाळीचे चौकीदार नाहीत. शाळेत असलेल्या परीक्षा उपयोगी साहित्याकडे कुणी लक्ष ठेवावे या पेचात शाळा प्रमुख व केंद्रप्रमुख सापडले आहेत. ३० एप्रिलपर्यंत शिक्षकांना शाळेत बोलाविल्यास त्यांना काही झाल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाईल, असे पत्र शिक्षण उपसंचालकांनी काढले. त्यामुळे शिक्षकांना शाळेत बाेलावता येत नाही. परीक्षेसंबंधी साहित्याची देखभाल करणे आणि त्या कामासाठी कुणाचेच सहकार्य नाही, अशा पेचात संस्था, शाळाप्रमुख व केंद्राध्यक्ष अडकले आहेत. ही मोठी समस्या शाळा प्रमुखांसमोर उभी ठाकली आहे. या साहित्याच्या संबंधाने मुख्याध्यापक व केंद्राध्यक्ष यांच्यात धाकधूक वाढली आहे.

..............

कोट

कोऱ्या उत्तरपत्रिका व इतर साहित्य सांभाळण्यासाठी शाळांकडे यंत्रणा नाही त्यामुळे हे साहित्य पोलीस ठाण्यात किंवा तहसीलदारांच्या कस्टडीत ठेवण्यात आले तर बरे होईल.

- व्ही.डी. मेश्राम, अध्यक्ष शिक्षक भारती मुख्याध्यापक संघटना

....

कोरोनाच्या काळात चौकीदार नाही आणि शाळा प्रमुखावरच जबाबदारी, तर २४ तास कशी राखण करणार, यासाठी मंडळाने याचा गांभीर्याने विचार करून या कालावधीत चौकीदार नेमावेत.

- टी.एस. गौतम, मुख्याध्यापक मानवता विद्यालय, बेरडीपार

........

कोऱ्या उत्तरपत्रिका व इतर साहित्य सांभाळण्याचा ताप मुख्याध्यापक व केंद्राध्यक्षांवर आहे. कोविडच्या संकट काळात आमचाही विचार करण्यात यावा. त्यासाठी शिक्षण मंडळाने तोडगा काढावा.

- अनिल मंत्री, प्राचार्य सरस्वती विद्यालय अर्जुनी-माेरगाव.

...............................

हे साहित्य कस्टडीत

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्ट, स्टीकर, सीटिंग प्लॅन, ए.बी. लिस्ट, विषयनिहाय, माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य हे मुख्याध्यापक व केंद्राध्यक्षांच्या कस्टडीत देण्यात आले आहे.

.....

विद्यार्थ्यांची आकडेवारी

दहावीचे विद्यार्थी- २२५२२

बारावीचे विद्यार्थी- २०८५६

........

परीक्षा कधी?

पुढील प्रवेश कधी?

१) इयत्ता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेतली जाणार आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग कमी झाला नाही तर या परीक्षा पुढे वाढतील.

२) इयत्ता बारावीच्या परीक्षा १० जूननंतर घेण्याचे ठरविण्यात आले; परंतु कोरोनाची काय स्थिती राहते यावर पुढच्या परीक्षा ठरणार आहेत.

३) परीक्षा झाल्यानंतर एक महिन्यात निकाल लावण्यात येणार आहे. निकाल हातात आल्यानंतर लगेच पुढच्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल.

४) पुढील प्रवेश ऑगस्ट महिन्यात होणार असे आता गृहीत धरण्यात आले आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग लांबला तर या परीक्षा व प्रवेशही लांबणार आहे.