शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

संपतीच्या वादातूनच केला भावाचा खून

By admin | Updated: June 18, 2014 00:15 IST

संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या

गोंदिया : संपत्तीच्या वादातून महिन्याभरापूर्वी दोन भावांमध्ये वाद झाला. त्याचा वचपा काढण्यासाठीच लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही घटना गुरूवारच्या रात्री ११ वाजता आमगाव तालुक्याच्या शिवनी येथे घडली. दरम्यान यातील लहान भावासह इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.शिवनी येथील भागवत गणपत तावाडे (३५) यांचे त्याच्या पत्नीशी काही दिवस न पटल्यामुळे ती माहेरी गेली होती. परंतु १७ एप्रिलला तिला भागवतने आपल्या घरी परत आणले. त्याचा राग भागवतचा लहान भाऊ वासुदेव गणपत तावाडे (२६) याला होता. या शिवाय वासुदेवने व भागवतने दोघांनी वाहन खरेदी केले होते. त्यामुळे वासुदेववर कर्ज होते. ही कर्जाची परतफेड करण्यासाठी वासुदेवने जमीन विक्रीची गोष्ट आपल्या आईवडीलांसोबत केल्यामुळे माझ्या हिस्याची जमीन विकू नका, असे भागवतने म्हटले होते. त्यामुळे महिन्याभरापूर्वी दोन्ही भावांचे भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्याच्या चंग वासुदेवने बांधला. त्यासाठी त्याने कट रचला. भागवतकडे टाटा सुमो गाडी असल्याने ती गाडी भाड्याने चालत होती. त्यासाठी जवरी येथील एका महिलेच्या प्रसुतीसाठी तिला गोंदियाला न्यायचे आहे, असा फोन एका मोबाईलवरून निलाराम शंकर तावाडे (३८) या भागवतच्या काके भावाला आला. त्यामुळे निलारामने त्याला वाहन नेण्यास सांगितले. त्यावर भागवतने जवरीचे लोक पैसे देत नाही मी जात नाही, असे म्हटल्यावर निलारामने मी पैसे देईल तू गरीबांची सेवा कर, बाळतीणीला घेऊन जा, असे म्हटल्यावर भागवत बाळंतीणीला घेण्यासाठी टाटा सुमो एमएच २७/डी-७२९ घेऊन निघाला. वाटेत वाहनात डिझेल भरण्यासाठी तो आमगावला आला. त्याच्या वाहनात जवरी येथील दोन युवक बसले होते. डिझेल भरून ही टाटा सुमो किंडगीपारवरून जवरीकडे जात होती. या टाटा सुमोला दूरवरून पाहणाऱ्या वासुदेव तावाडेने दुचाकीने पाठलाग करून अर्ध्या रस्त्यावर टाटा सुमोच्या समोर आपली दुचाकी उभी केली. गाडीत असलेल्या दोघांनी व वासुदेवने ठरल्याप्रमाणे भागवतला टाटा सुमोच्या खाली उतरवून बांध्यामध्ये नेले. तेथे त्याला लोखंडी रॉडने मारले. परंतु भागवतने कशीबशी सुटका करून त्याच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. ३०० मीटर अंतर धावत कापणारा भागवत रक्त्याच्या थारोळ्यात होता. धावता-धावता त्याचा पाय एका बांधीच्या धुऱ्याला अडकल्याने तो खाली पडला. याचाच फायदा आरोपींनी घेतला. त्याचा पाठलाग करणाऱ्या आरोपींनी त्याला अखेर ठार केले. त्यानंतर त्याला नवेगाव रस्त्यावरील कालव्याजवळ नेऊन गाडीसह कालव्यात ढकलले आणि हा अपघात वाटावा असा प्रयत्न आरोपींनी केला. या घटनेसंदर्भात आरोपी वासुदेव गणपत तावाडे (२६), निलाराम शंकर तावाडे (३८) दोन्ही रा.शिवनी व जवरी येथील हुमे कुटूंबातील दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी अपघाताचा देखावा करण्याचा प्रयत्न केला, परंतू या घटनेचे पुरावे काही वेगळे सांगत होते. या घटनास्थळाला पाहणारे हा खूनच असावा असे बोलत होते. या घटनेसंदर्भात सुरूवातीला आमगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला होता. परंतु तपासात सदर खून असल्याचे उघडकीस आले. या घटनेत आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३०२, १२० ब, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वासुदेव तावाडे हा मद्यप्राशन करीत नाही. परंतु घटनेच्या दिवशी त्याने मद्यप्राशन केले होते. सदर आरोपींना अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक डी.बी.मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.पवार, शरद शेळके, हवालदार राऊत, विनोदकुमार बरैया यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)