शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील कालीसरार धरणाच्या भिंतीला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 19:23 IST

सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुध्दा वाढला आहे.

ठळक मुद्दे धरण फुटण्याची शक्यतारोजंदारी मजुराच्या भरवशावर धरणाची देखरेख

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राखीव जलसाठा ठेवून पिण्याच्या पाण्यासह शेतीला सिंचनासाठी संकटाच्या वेळी उपयोगी पडणारे सालेकसा तालुक्यातील कालीसरार धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या भिंतीचे लिकेज वाढल्याने पाण्याच्या अपव्यय होत असून धरण फुटण्याचा धोका सुध्दा वाढला आहे.महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेलगत बिजेपार ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या कालीसरार धरण आहे. या धरणा खालून वाहणारा नाला सालेकसा आणि देवरी तालुक्याला विभाजीत करतो. अतिसंवेदनशील भागात असलेला या प्रकल्पातून पाणी सिंचन करण्यासाठी स्वतंत्र कालवे नसून या धरणाच्या पाण्याची गरज पडल्यास ते पाणी सरळ पुजारीटोला धरणात सोडले जाते व गरजेनुसार पाण्याचे वितरण केले जाते. परंतु या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने येथील पाणी वापरात कमी व वाया जास्त जाते.

लाख मोलाचे पाणी दरवर्षी उपयोग विना सुध्दा संपून जाते. परंतु बाष्पीभवन होऊन पाणी कमी झाले असे उत्तर येथील संबंधित विभागाचे कर्मचारी देतात. एखाद्या वर्षी येथील पाण्याचा उपयोग केला नाही तरी पाण्याची पातळी अगदी ३० ते ३५ टक्के पर्यंत खाली येते. अर्थात लिकेजमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते हे कुणीच नाकारु शकत नाही. परंतु लिकेजकडे सतत दुर्लक्ष केल्यास धरण फुटण्याचा सुध्दा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.कालीसरार धरणाला एकूण चार दरवाजे असून एक टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठवण करण्याची क्षमता या धरणात आहे. जेव्हा या धरणातून पाणी सोडले जाते तेव्हा डाव्या बाजूच्या भिंतीला असलेल्या लिकेजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.

अशात लिकेज आणखी मोठा झाला तर धोका ही वाढेल. येथील पाणी सुरक्षित राहिले तर दोन्ही हंगामात दोन हजार हेक्टर शेतीला भरपूर पाणी सिंचन होईल एवढ्या पाण्याची मदत कालीसरार धरणातून पुजारीटोला धरणाला मिळू शकेल. कालीसरारचे पाणी विशेष करुन पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाते. परंतु उन्हाळा येईपर्यत धरण अनेकदा रिकामे होते. अशात या धरणाचे पाणी शेवटपर्यंत संग्रहीत व सुरक्षित राहावे म्हणून प्रयत्न केले पाहिजे. नक्षलग्रस्त भागात असलेल्या या धरणाच्या देखभाल दुरूस्तीकडे लक्ष देणे सुध्दा आवश्यक आहे.

टॅग्स :Damधरण