शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ढिसाळ नियोजनामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:21 IST

नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली.

ठळक मुद्देन.प.चे भूमिअभिलेख विभागाकडे बोट : मोहीमेसाठी पुन्हा तारीख

ऑनलाईन लोकमतगोंदिया : नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीमेसाठी मुर्हुत सापडत नव्हता. मात्र बऱ्याच कालावधीनंतर मुहूर्त सापडल्यानंतर सोमवारपासून (दि.२६) पासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात केली. पण, अतिक्रमण नसलेल्यांना सुद्धा न.प.च्या नगर रचना विभागाने नोटीस बजावली. परिणामी नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबवावी लागली. मोहीम सुरु करण्यापूर्वी योग्य नियोजन केल्याचा या मोहिमेला फटका बसला.शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येमुळे मुख्य रस्ते दिवसेंदिवस अधिक अरुंद होत चाललेले आहे. यामुळे शहरात वाहतुकीच्या कोंडीचे चित्र नेहमीच पाहयला मिळते. याचा फटका शहरवासीयांना बसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून शहरातील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.अतिक्रमण हटाव मोहीमेबाबत नगर परिषदेचा अनुभव चांगला नाही. अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान मारहाणीचे प्रकार सुध्दा घडले आहेत. तर बरेचदा राजकीय अडचण आड येत असते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यासाठी नगर परिषदेकडून तारीख पे तारीख दिली जात होती. पण, बऱ्याच कालावधीनंतर नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचा मुर्हुत सापडला. भूमिअभिलेख विभागाकडून अतिक्रमणीत जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपासून (दि.२६) शहरातील कुडवा चौक ते एनएमडी कॉलेजपर्यंतचे अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.मात्र या दरम्यान अतिक्रमण नसलेल्या काही जणांना नोटीस बजाविण्यात आली. पण, त्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे इतर अतिक्रमणधारकांनी यावर आक्षेप घेत आमचे अतिक्रमण हटविले मग त्यांना का सुट असा सवाल न.प.मुख्याधिकाºयांना उपस्थित केला. ज्यांना नोटीस बजाविण्यात आली त्यांचे अतिक्रमण नसून न.प.नगररचना विभागाच्या चुकीमुळे त्यांना नोटीस गेल्याचे सांगितले.मात्र नगररचना विभागाच्या चुकीमुळे मोहीमेदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली. तसेच अधिकाºयांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.त्यामुळे नगर परिषदेला अर्ध्यावरच मोहीम थांबवावी लागली. मंगळवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीमेला सुरूवात होईल, या प्रतिक्षेत नागरिक होते. मात्र नियोजन फसल्याने अतिक्रमण हटाव मोहीम लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिली.पालिकेने फोडले भूमिअभिलेख विभागावर खापरअतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान नोटीस बजाविण्यावरुन वाद निर्माण झाला. तेव्हा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाने दिलेल्या मोजणीच्या यादीनुसारच नोटीस बजाविल्याचे सांगितले. त्यावेळीच भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्ही दिलेल्या यादीत संबंधित अतिक्रमणधारकांची नावे नसल्याचे सांगितले. ही चूक नोटीस काढणाऱ्या नगररचना विभागाची असल्याचे सांगीतले तेव्हा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.