शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

दारूच्या बाटल्यांवर ब्रेड-बिस्कीटची सोय

By admin | Updated: November 1, 2014 23:10 IST

दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही.

गोंदिया : दिवाळी म्हणजे लहान मुलांसाठी नवीन कपडे, गोडधोड खाण्याचा आणि फटाके उडविण्याचा आनंद देणारा सण, पण गोरगरीब कुटुंबातील व्यसनाधीन बापांच्या मुलांच्या नशिबी हा आनंद आलाच नाही. त्यांना वडिलांनी ढोसलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या विकूनच आपल्या ब्रेड-बिस्कीटची सोय करावी लागत आहे.सकाळी चहासोबत ब्रेड-बिस्कीट देण्याची ऐपत नसलेल्या वडिलांची मुले बापाने फस्त केलेल्या दारूच्या बाटलीवर ब्रेड-बिस्कीट खरेदी करतानाचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक घरांत सकाळीच ‘बाबा’ दारूचा पव्वा कुठे आहे, हा स्वर कानी पडतो. मुलाला १ रुपयाचे ब्रेड खरेदी करून देण्याची ऐपत नसलेला पिता मात्र रोज ३५ ते ४० रुपयांची दारू ढोसतो. हे विदारक चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते.महाराष्ट्र शासन तंटामुक्तीच्या माध्यमाने गावात दारूबंदी करण्यास प्रोत्साहन करते. एकीकडे शासनच दारू परवाने, दारू काढण्यास, विक्री करण्यास प्रोत्साहन करते. शासनच नियम धाब्यावर बसवते. सरकार स्वतच्या स्वार्थासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची ऐशीतैशी करते. महात्मा गांधी तंटामुक्त एकही गावात दारूबंदी नाही. फक्त कागदावरच नावाचा उदोउदो करण्यासाठी पोलिस खोटा अहवाल सादर करण्यास बाध्य करतात. या कालावधीत अनेक घटना घडून गेल्या. दारूबंदीची पुरती वाट लागली आहे. रोजगाराअभावी दारूविक्री करून उदरभरण करणारा स्वतंत्र वर्ग समाजात निर्माण झाला आहे. पाण्याचा पैसा कमविणारे समाजात प्रतिष्ठित म्हणून पुढे आले आहेत. जिल्ह्यात रोजगाराचे साधन नाही. मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या भरमसाठ आहे. हातावर आणून पानावर खाणारेही कमी नाहीत. दिवसभरातील कामाचा क्षण घालविण्यासाठी दारूचा घोट पोटात रिचविल्या जाते. दिवसभर अंगमेहनत करून ६० ते ७०रुपये मजुरी हाती पडते. ही मजुरी मिळविण्यासाठी दिवसभर काम करावे लागते. त्या कामाचा क्षण घालविण्यासाठी कामावलेले अर्ध्यापेक्षा जास्त रुपये खर्च होतात. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी ओढाताण सहन करावी लागते. फाटक्या शर्टाने, विनाचपलांनी हातात पुस्तक घेऊन मुलगा शाळेत जातो. पोटात दोन वेळचे अन्न मिळत नाही. तरीही वडील दारू पितात. वडिलांकडे पैशाची मागणी केली तर पाठीवर थपाटा मिळेल, ही भीती त्यांना असते.