शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

व्यसनमुक्तीसाठी ब्रह्माकुमारीज्चा पुढाकार

By admin | Updated: January 22, 2016 02:48 IST

विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असलेल्या भावी पिढीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रजापिता

गोंदिया : विविध प्रकारच्या व्यसनांच्या आहारी जात असलेल्या भावी पिढीला त्यापासून परावृत्त करण्यासाठी ब्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी माझे गोंदिया- व्यसनमुक्त गोंदिया’ असे घोषवाक्य रूढ करून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात विद्यार्थी व शिक्षकांमध्ये जनजागृती केली जाईल, अशी माहिती या संस्थेच्या व्यसनमुक्ती शाखेचे डॉ.सचिन परब यांनी गुरूवारी येथे पत्रकारांना दिली.याबाबत अधिक माहिती देताना डॉ.परब यांनी सांगितले की, आता बहुतांश शिक्षक व्यसनाधीन झाले आहेत. काही जण तर विद्यार्थ्याच्या हातूनच खर्रा बोलवतात. यामुळे खर्रा, तंबाखूचे व्यसन करण्यात गैर काही नाही अशी विद्यार्थ्यांनी भावना होऊन ते सुद्धा अल्पवयात व्यसनाच्या आहारी जातात. वास्तविक शाळा-महाविद्यालयांपासून १०० यार्डाच्या अंतरावर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करता येत नाही. पण कायद्याचे पालन कोणीही करीत नाहीत. बहुतांश लोकांना तर कायद्याची माहितीच नसते. दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात सर्रास चोरट्या मार्गाने दारू विक्री केली जाते. खर्ऱ्याची बंदी सर्वत्र असली तरी खर्रा सहज मिळतो. केवळ कायदा करून होणार नाही किंवा दारूची विक्री बंद करून हे सर्व थांबणार नाही, त्यासाठी दुष्परिणामांची माहिती देऊन जनजागृती करून मागणी कमी केली जाऊ शकते. त्यासाठी राजयोगाच्या (मेडिटेशन) माध्यमातून कोणत्याही व्यसनापासून मनुष्याला परावृत्त केले जाऊ शकते, फक्त त्याची व्यसन सोडण्याची तयारी असली पाहीजे असे डॉ.परब यांनी सांगितले.मुख्यमंत्री आणि राज्याच्या शिक्षण विभागाकडून या संस्थेला शाळा-महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या पत्रपरिषदेला बी.के.जयश्री बहन, बी.के.मीना बहन, बी.के.अलका बहन, गोंदियाच्या संचालिका बी.के.रत्नमाला बहन, तसेच विनोद हरिणखेडे, त्रिलोकचंद बग्गा, महेंद्र ठाकूर, जितेंद्र अग्रवाल, हरसूकभाई आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)वाढतेय वेगवेगळे व्यसन४केवळ दारू किंवा तंबाखूचेच व्यसन नाही तर आजकाल मुलांमध्ये मोबाईल-इंटरनेटचेही व्यसन जडत आहे. यामुळे अनेक पालक चिंताग्रस्त आहेत. त्यापासून त्यांना परावृत्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून शाळांनी-पालकांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे डॉ.शेंडे म्हणाले.युवकांना वाचवणे गरजेचे४तंबाखूमुळे देशात दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. आम्हाला कोणाचाही व्यवसाय बंद करायचा नाही, पण युवकांना वाचवायचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळा-कॉलेजमध्ये काऊन्सिलिंग केली जाणार असल्याची माहिती डॉ.परब यांनी दिली. यात नंतर परिणामकारक शाळांना व्यसनमुक्त शाळा म्हणून घोषित केले जाईल.