शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेततळी ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 00:50 IST

मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे.

ठळक मुद्देमागेल त्याला शेततळे योजना : सिंचनासाठी झाली मदत

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील वर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला.एकीकडे जलयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना पूरेपूर पाण्याची सोय झाली नसताना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे कृषी क्षेत्राला आधार ठरत आहे. मागेल त्याला शेततळे योजनेतून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्याचे दिलासा दायक चित्र तालुक्यात आहे.तालुक्यात ३० हजार हेक्टरच्या जवळपास सिंचनाचे क्षेत्र आहे. कटंगी मध्यम प्रकल्प व कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी पिकासाठी पाणी दिले जाते. मात्र तालुक्यातील बरीच शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तालुक्यातील शेतकºयांना दरवर्षी बसतो.तालुक्यातील शेतकºयांना कालव्याचा पाण्याचा आधार मिळत नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणी पुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे या कालावधीत फळबाग व ठिंबक सिंचनावर घेतल्या जाणाऱ्या पिकांना कृषी विभागाच्या मदतीने तयार करण्यात आलेले शेततळे वरदान ठरत आहेत. तालुक्यातील काही गावांमध्ये कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजनांची कामे राबविली. मात्र यामध्ये पाहिजे त्याप्रमाणात पाणीसाठा नाही. मात्र मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गत तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी साठवून ठेवून त्याचा सिंचनासाठी उपयोग करण्यास शेतकºयांना मदत होत आहे. मार्च २०१६ पासून कृषी विभागाकडून मागेल त्याला शेततळे या योजनेच्या माध्यमातून शेततळे तयार करणाºया शेतकऱ्यांला जास्तीत-जास्त ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. गोरेगाव तालुक्यात मागेल त्याला शेततळे योजनेतून २०१६-२०१८ या वर्षात १३५ शेततळे पूर्ण करण्यात आली. तर सन २०१८-१९ या वर्षात १४१ शेतकऱ्यांना शेततळ्यांसाठी आॅनलाईन मंजुरी देण्यात आली.यापुर्वी २०१६ मध्ये तत्कालीन तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांनी मागेल त्याला शेततळी योजनेतून शंभर टक्के शेततळयाची कामे करुन तालुक्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदाही होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती