शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांना बसली खीळ

By admin | Updated: March 31, 2016 02:02 IST

तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी येथे शौचालय कामात घोळ झाल्याचे १९ मार्च वृत्त प्रकाशित झाले.

शौचालय कामात घोळ : दोन वर्षांनी उघडली उपसरपंचाची झोपपरसवाडा : तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाळी येथे शौचालय कामात घोळ झाल्याचे १९ मार्च वृत्त प्रकाशित झाले. याबाबत चौकशी करीत असताना मागील कार्यकारिणीच्या सदस्यांनी घोळ न झाल्याचे सांगितले. मात्र सरपंच व उपसरपंच यांच्या नाकर्तेपणामुळेच विकास कामांना खीळ बसल्याचे बोलले जात आहे.यात आरोपकर्ते सुभाष कावळे हे कार्यरत उपसरपंच व यापूर्वीचेही उपसरपंच यांच्या कार्यकाळात शौचालयांचे बांधकाम झाले व सध्या सुरू आहेत. त्यावेळी त्यांना जाग आली नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. दोन वर्षापासून निर्मल भारत अभियान व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधकाम करण्यात आले. लाभार्थ्यांची मनरेगा व निर्मल भारत अभियान अंतर्गत कामे झाली. आॅनलाईनप्रमाणे देयक देण्यात आले. अपुरे काम सुरू आहेत. एकाच व्यक्तीला दोन लाभ देण्यात आले नाही. कुटुंब व घर वेगळे असल्यामुळे त्या कुटुंबांना लाभ देण्यात आले, याची माहिती पं.स. व मासिक मिटिंगमध्ये जमा खर्च विषयात कॅशबुकमध्ये नोंद घेतली जाते. तेव्हा उपसरपंच मिटिंगमध्ये झोपत होते काय? असा सवाल केला जात आहे.आता पुन्हा ६५ शौचालयांचे काम करावयाचे आहे. हे कोण व कसे बनविणार, याकडे सरपंच व उपसरपंच लक्ष केव्हा देणार? ७ आॅगस्ट रोजी नवीन कार्यकारिणी बनली. ३१ डिसेंबरपर्यंत १३ व्या वित्त आयोगाच्या खर्चाची मर्यादा होती, पण याकडे लक्ष नाही. बरे झाले मार्चपर्यंत मुतदवाढ मिळाली. तरी फक्त १० दिवस उरले. फक्त नालीचे खोदकाम झाले. १४ व्या वित्त आयोगाकडे तर लक्षच नाही. याचे कारण म्हणजे सरपंच, उपसरपंच व इतर पाच सदस्यांवर कलम १४ (ब) व ३९ (१) ची टांगती तलवार आहे. आपल्या लोकांना संरक्षण दिले म्हणून ३९ (१) ची केस दाखल झाली व त्यामुळे दुसऱ्या लोकांनी अतिक्रमण केले. उपमुख्य कार्यकारी बागडे व सिंगनजुडे यांनी ३९ (१) ची चौकशी केली. तेव्हा आम्ही नवीन आहोत, आम्हाला कायद्याची जाण नव्हती, असे बयानात सांगितले. पाच वर्षे उपसरपंच व सदस्य असतानाच अतिक्रमरण धारकास नोटीस देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मागितली तरी नवीन आहोत असे बयान देतात. पाच वर्षात काहीच शिकले नाही काय? मग आधी बल्ब खरेदी करणे, मोटार खरेदी करणे, मग दरपत्रक मंजूर करणे, नंतर ठराव घेणे, आपल्या मनमर्जीने अंदाजपत्रकाविना मुरुम टाकणे, ग्रा.पं. च्या समित्या मनमर्जीने यादी बनवून कोणतीही निवड न करता बंद झालेल्या प्रोसिडिंगवर चपराशीवर दबाव आणून लिहिणे, पत्नी ग्रामसेवक असताना असेच कायदे शिकले काय? आदी प्रश्न विचारले जात आहेत.गावात १५ दिवसांपासून पाच बोअरवेल्स बंद आहेत, स्ट्रीट लाईट बंद आहेत. सहा महिन्यांपाूसन नळ योजनेचे काम पूर्ण झाले असताना दोन-तीन जि.प.चे पत्र असताना डिमांड भरुन उन्हाळा बघता पाणी सुरु करण्याकडे उपसरपंच यांचे मुळीच लक्ष नाही. त्यांचे लक्ष केवळ गावात बोगस डॉक्टरी करणे, शेप अग्रो प्रोडक्ट मार्केटिंग भंडाराकडून गरिबांना शेळी देऊन त्यांचे पिल्ले विक्री करणे, त्यांच्याकडून गरिबांना शेळ्या देऊन त्यांचे पिल्ले विक्री करणे व त्यांच्याकडून ६० रुपये महिना जमा करणे, याच कामांत आहे.शिवाय सात ते बारा वर्षात ६० रूपयांचे दहा हजार होणार व शेळीचे ५० हजार मिळणार, असे गोरगरिबांना सांगणे. तसेच जय सिद्धी विनायक प्रोडूसर कंपनीचे आरडी, फिक्स डिपाजिट करणे, विविध प्रकारच्या पॉलिसी जमा करणे आदी कामांतच त्यांना रस आहे. आता बरेच लोक मॅच्युरिटी झालेल्या पैसासाठी उपसरपंचाकडे चकरा मारतात. कोणी शिवीगाळ करतात, कोणी मोटारसायकल अडवितात. यामुळेच गावात असंतोष पसरलेला आहे, शौचालयामुळे नाही. अशी माहिती सरपंच संगीता भगत, गणेश येडे, जागेश्वर निमजे, राजेश कोसमे, मनोहर भरणे व गोविंद ठाकरे, छगन राने, शैलेष बोरकर, माधो धानगाये, राजकुमार शेंडे, बक्षी सादेपाच, टिकेश्वरी शहारे, लीलाधर ठाकरे आदी आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.