शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
4
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
5
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
7
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
8
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
9
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
10
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
12
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
13
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
14
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
15
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
16
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
17
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
18
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
19
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
20
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रांचे बोगस परवाने

By admin | Updated: July 17, 2014 00:11 IST

खरीप हंगामात खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी काही भागात खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून खताची अतिरिक्त दराने विक्री केली जाते. या हंगामी परिस्थितीचा लाभ घेण्याकरिता

गोंदिया : खरीप हंगामात खताची मागणी मोठ्या प्रमाणात असते. दरवर्षी काही भागात खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून खताची अतिरिक्त दराने विक्री केली जाते. या हंगामी परिस्थितीचा लाभ घेण्याकरिता कृषी केंद्र संचालकांना बनावट परवाने तयार करून देणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होत आहे. या बनावट परवान्याच्या आधारावर कृषी साहित्याची विक्री करण्याच्या गोरखधंद्याला यामुळे उधान येण्याची शक्यता आहे.धान उत्पादकांच्या या जिल्ह्यात जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात खतांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यात काही मोठे खते विक्रेते आहेत. किरकोळ कृषी केंद्र संचालकांना अधिकृत विके्रत्यांकडून खताची उचल करण्याकरिता कृषी विभागाचा परवाना व पंचायत समितीकडून ‘ओ’ फॉर्मची गरज असते. दरवर्षी खताच्या विक्रीत वाढत होत आहे. यासोबत कृषी केंद्र संचालकांची संख्यादेखील वाढत आहे. जे खत विक्रेते अधिकृत विक्रेत्याकडून खताची उचल करतात, त्यांना एमएआरपीच्या दराने खताची विक्री करावी लागते. मात्र दोन-तीन वर्षांचा इतिहास पाहता खताची ऐन हंगामाच्या काळात टंचाई निर्माण केली जाते. यासाठी काही मोठे खत विक्रते विशेष भूमिका पार पाडतात. ग्रामीण भागातील काही लोकांनी कृषी केंद्राचा बनावट परवाना तयार करून कृषी केंद्रे थाटली आहेत. या कृषी केंद्रांची कृषी विभागाकडे अधिकृतपणे नोंद नसल्याने केंद्र संचालक मोठ्या खत विक्रेत्यांशी जुळवाजुळव करून खताची उचल करतात व एमआरपीपेक्षा अधिक दराने विक्री करतात. विशेष म्हणजे टंचाईच्या काळातदेखील या खते विक्रेत्यांकडे खताचा स्टॉक उपलब्ध असतो. यातून जो नफा प्राप्त होतो तो मोठे खते विक्रेते व लहान कृषी केंद्र संचालक यांच्यात वाटप केला जात असल्याचे बोलल्या जाते. हा प्रकार बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. यातून बनावट कृषी केंद्राचे परवाने तयार करायचे व चार महिन्यांच्या हंगामात भरपूर नफा कमवायचा व मोकळे व्हायचे, हा प्रकार समोर आल्याचे एका मोठ्या खत विक्रेत्याने सांगितले. यात काही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे बोलल्या जाते. मात्र या बनावट कृषी परवाने तयार करण्याच्या प्रकारात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. या बोगस परवाने तयार करणाऱ्यांना हुडकून काढून वेळीच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)