शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मृतदेहांनाही सोसाव्या लागतात यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 21:00 IST

जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत.

ठळक मुद्देशवागारातील फ्रीजर नादुरूस्त : व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्नच नाहीत
<p>लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जीवंतपणी झाले ते झाले मात्र मरणानंतर तरी शरिराचे हाल होऊ नये अशी सर्वांचीच अपेक्षा असते. मात्र येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात (मर्च्युरी) मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत असल्याचे प्रकार घडत आहेत. मृतदेहांना सुरक्षीत ठेवण्यासाठी असलेले फ्रीजर नादुरूस्त असल्यामुळे मृतदेहांचेही हाल होत आहेत. मात्र व्यवस्थेच्या नावावर केटीएस रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे.गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आल्यापासून अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यात भडके उडू लागले आहेत. रूग्णालयाच्या विषयांना घेऊन दोघांत तनातनी दिसते. केटीएस रूग्णालयातील शवागार व्यवस्थेतील सुधाराच्या नावावरही दोघांत वातावरण तापलेले आहे. अशात दुरूस्ती तर काही होत नाही उलट शवागारात येणाऱ्या मृतदेहांनाही यातना सोसाव्या लागत आहेत.मागील काही दिवसांपुर्वी नवेगावबांध येथील एक मृतदेह सुरक्षीत ठेवण्यासाठी येथील केटीएस रूग्णालयातील शवागारात पाठविण्यात आले होते. दोन दिवस ठेवल्यानंतर मात्र मृतदेह ठेवण्यासाठी आनाकानी केली जात असल्याची माहिती आहे. शवागारातील फ्रीजर नादुरूस्त असूनही तो मृतदेह येथेच ठेवण्यात आला. याबाबत वैद्यकीय महाविद्यालयातील प्रभारी अधिष्ठाता डॉ. वी.पी.रूखमोडे यांना विचारणा केली असता त्यांनी फ्रीजर नादुरूस्त असल्याचे सांगत याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक खरी माहिती देणार असे सांगीतले.माहितीनुसार, केटीएस रूग्णालयात मृतदेह सुरक्षीत ठेवण्यासाठी चार फ्रीजरची व्यवस्था आहे. मात्र चारही फ्रीजरचे तळ खराब झाल्याने रूग्णालयातील कर्मचारी मृतांच्या नातेवाईकांना बर्फाच्या लादीची व्यवस्था करण्यासाठी सांगतात. मात्र त्यानेही काहीच होत नसून फ्रीजरची व्यवस्था नसल्याने मृतदेहांचे हालच होत आहेत.जबाबदारीला घेऊन टोलवा-टोलवीशवागारच्या दुरूस्तीला घेऊन काय प्रयत्न केल जात आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, हे त्यांचे काम नसल्याचे स्पष्ट सांगीतले. रूग्णालयाची पुर्ण व्यवस्था वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात आली आहे. यामुळे आता अधिष्ठाताच काही करू शकतील असे त्यांचे म्हणणे आहे. तर अधिष्ठाता डॉ. रूखमोडे यांनी रूग्णालयाचा कारभार जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे असल्याने तेच याबाबत सांगू शकतील असे सांगीतले.