शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

अतिक्रमणधारकांना दिला ‘जोर का झटका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:01 IST

व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली.

ठळक मुद्देरस्त्यावरील अतिक्रमण काढले : वाहतूक नियंत्रण शाखेची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. शुक्रवारी (दि.१०) राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी व्यापाऱ्यांनी रस्त्यावर मांडलेले साहित्य जप्त करून रस्ते मोकळे केले. वाहतूक नियंत्रण शाखेच्या या मोहिमेमुळे मात्र शहरातील व्यापाºयांना ‘जोर का झटका’ बसला.शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात व्यापारी रस्ताच्या दोन्ही बाजुंनी आपल्या दुकानातील साहीत्य मांडून आणखी अतिक्रमण करतात. यामुळे रस्ते आणखीच अरूंद होवून नागरिकांना वाहतूक करताना त्रास सहन करावा लागतो.शहरातील बाजार भागात पावला-पावलावर वाहतुकीची कोंडी होत असून नागरिकांना आता बाजारात येणे नकोसे झाले आहे. मात्र व्यापारी आपले साहित्य रस्त्यावर मांडून मोकळे होत असून नागरिकांच्या त्रासाला घेऊन त्यांना काहीच सोयरसुतक नाही. एवढेच नव्हे तर, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या दुकानासमोर गाडी उभी केल्यास त्या व्यक्तीला ते आपल्या दुकानासमोर गाडी उभी करून देत नाही. उलट आपल्या मालकीची जागा असल्याचा आव आणत भांडणावर उतरतात.परिणामी नागरिकांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून सामानाची खरेदी करावी लागते. एक-दोन करीत वाहनांची रांगच लागत असून अन्य नागरिकांचा यामुळे त्रास सहन करावा लागतो. बाजारातील हे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात यावे. अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली होती.नागरिकांच्या या समस्येची गांर्भीयाने विचार करीत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला व्यापाऱ्यांचे हे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवारी (दि.१०) शहरातील बाजार भागात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.यांतर्गत वाहतूक नियंत्रण शाखा व नगर परिषदेच्या संयुक्तवतीने बाजार भागातील व्यापाºयांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.या भागात राबविली मोहीमवाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक संजय सिंग यांच्यासह वाहतूक शाखेचे १० कर्मचारी व १० पोलीस कर्मचारी तसेच नगर परिषद बांधकाम विभागातील अभियंता कावडे, अनिल दाते नियोजन विभागातील अभियंता शरणागत, सलाम यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. यांतर्गत चांदनी चौक ते गांधी प्रतिमा, गांधी प्रतिमा ते गोरेलाल चौक, गोरेलाल चौक ते नेहरू चौक तसेच रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत रेल्वे स्टेशन रोड व पाल चौक परिसरात अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यात आली.२० व्यापाऱ्यांवर केली कारवाईया मोहिमेंतर्गत पथकाने शहरातील २० व्यापाऱ्यांवर १०२ अंतर्गत कारवाई केली आहे. काही व्यापाºयांचे सुमारे ३५ हजार रूपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता व्यापाºयांना न्यायालयातून त्यांचे सामान सोडवून घ्यावे लागणार आहे. या मोहिमेनंतर व्यापाºयांचे रस्त्यांवरील सामान दिसेनासे झाल्याने रस्ते मोकळे झाल्याचे चित्र होते.शनिवारीही बाजार भागात मोहीमशहरवासीयांची वाहतुकीच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक साहू यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला सातत्याने ही मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने शनिवारीही बाजार भागात मोहीम राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, ही मोहीम आता सातत्याने सुरू राहणार असून ज्या कुणाकडून रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडचण निर्माण केली जाईल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेचे निरीक्षक संजय सिंग यांनी सांगीतले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणtraffic policeवाहतूक पोलीस