शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सुरक्षा ठेव परत न करणाऱ्या एमआयडीसीला चपराक

By admin | Updated: November 20, 2014 22:54 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार

ग्राहक मंचचा निर्णय : २९ हजार रुपये व्याजासह द्यावेगोंदिया : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. यावर न्यायमंचाने दोन्ही पक्षांच्या सबबी एकूण सदर महामंडळाने ग्राहकाला नऊ टक्के व्याजासह २९ हजार ८१५ रूपये देण्याचे आदेश दिले.प्रमोद अग्रवाल हे राईस मिलचे मालक आहेत व औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील राईस मिलच्या आवारात असलेल्या सदनिकेत राहतात. तेथील कर्मचाऱ्यांना सदर महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जातो. शिवाय अग्रवाल यांचे कार्यालयसुद्धा त्याच परिसरात असल्याने ते स्वत:साठी व इतर लोकांसाठी पाण्याचा वापर करतात. मात्र मिल बंद झाल्यामुळे तेथील कर्मचारी इतरत्र गेले व डिसेंबर २०१२ मध्ये पाणी पुरवठा बंद झाला. अग्रवाल यांनी वेळोवेळी पाणी पुरवठ्याच्या जोडणीच्या सुरक्षा ठेवी एकूण २९ हजार ८१५ रूपये भरले. यानंतर ९ डिसेंबर २०१२ रोजी सुरक्षा ठेव परत मागितले. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच अग्रवाल यांना रदर रक्कम परत देण्यात येईल, असे सांगून न देण्याचे कसलेही कारण सांगितले नाही. ग्राहक न्यायमंचने आपल्या कारणमिमांसेत सदर महामंडळ व्यवसायाकरिता पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी सुरक्षा ठेवी भरल्याच्या पावत्यांची तपासणी केली. सुरक्षा ठेव परत करण्यासंबंधीचे महामंडळाचे अग्रवाल यांना पाठविलेले पत्र, नवीन भूखंडावरील नवीन नळ जोडणीसाठी नव्याने सुरक्षा ठेवीचे महामंडळाचे पत्र व सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे मंजुरी व शोधनासाठी सादर करण्यात आल्याचे अग्रवाल यांना कळविले. त्यावरून सुरक्षा ठेव अद्याप परत करण्यात न आल्याचे सिद्ध झाले. शिवाय अग्रवाल यांनी सदर महामंडळाकडे सुरक्षा ठेव परत मिळण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लेखी व तोंडी विनंत्या व त्याविषयीचे पत्र आदी बाबींवरून महामंडळाच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावरून ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी पुरवठ्याची सुरक्षा ठेव २९ हजार ८१५ रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने रक्कम मिळेपर्यंत द्यावे, शिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये द्यावे, आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे असा आदेश दिला आहे.(प्रतिनिधी)