शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा ठेव परत न करणाऱ्या एमआयडीसीला चपराक

By admin | Updated: November 20, 2014 22:54 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार

ग्राहक मंचचा निर्णय : २९ हजार रुपये व्याजासह द्यावेगोंदिया : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणी पुरवठा विभागाने पाणी बिलाची सुरक्षा ठेव परत न केल्याने ग्राहक प्रमोद हरिशचंद्र अग्रवाल रा.मनोहर चौक गोंदिया यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेतली. यावर न्यायमंचाने दोन्ही पक्षांच्या सबबी एकूण सदर महामंडळाने ग्राहकाला नऊ टक्के व्याजासह २९ हजार ८१५ रूपये देण्याचे आदेश दिले.प्रमोद अग्रवाल हे राईस मिलचे मालक आहेत व औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरातील राईस मिलच्या आवारात असलेल्या सदनिकेत राहतात. तेथील कर्मचाऱ्यांना सदर महामंडळाकडून पाणी पुरवठा केला जातो. शिवाय अग्रवाल यांचे कार्यालयसुद्धा त्याच परिसरात असल्याने ते स्वत:साठी व इतर लोकांसाठी पाण्याचा वापर करतात. मात्र मिल बंद झाल्यामुळे तेथील कर्मचारी इतरत्र गेले व डिसेंबर २०१२ मध्ये पाणी पुरवठा बंद झाला. अग्रवाल यांनी वेळोवेळी पाणी पुरवठ्याच्या जोडणीच्या सुरक्षा ठेवी एकूण २९ हजार ८१५ रूपये भरले. यानंतर ९ डिसेंबर २०१२ रोजी सुरक्षा ठेव परत मागितले. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतरच अग्रवाल यांना रदर रक्कम परत देण्यात येईल, असे सांगून न देण्याचे कसलेही कारण सांगितले नाही. ग्राहक न्यायमंचने आपल्या कारणमिमांसेत सदर महामंडळ व्यवसायाकरिता पाणी पुरवठा केला जात होता. त्यासाठी सुरक्षा ठेवी भरल्याच्या पावत्यांची तपासणी केली. सुरक्षा ठेव परत करण्यासंबंधीचे महामंडळाचे अग्रवाल यांना पाठविलेले पत्र, नवीन भूखंडावरील नवीन नळ जोडणीसाठी नव्याने सुरक्षा ठेवीचे महामंडळाचे पत्र व सुरक्षा ठेवीची रक्कम परत करण्यासाठीचे प्रस्ताव विभागीय कार्यालयाकडे मंजुरी व शोधनासाठी सादर करण्यात आल्याचे अग्रवाल यांना कळविले. त्यावरून सुरक्षा ठेव अद्याप परत करण्यात न आल्याचे सिद्ध झाले. शिवाय अग्रवाल यांनी सदर महामंडळाकडे सुरक्षा ठेव परत मिळण्यासाठी वेळोवेळी केलेल्या लेखी व तोंडी विनंत्या व त्याविषयीचे पत्र आदी बाबींवरून महामंडळाच्या सेवेतील त्रुटी सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावरून ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पाणी पुरवठ्याची सुरक्षा ठेव २९ हजार ८१५ रूपये दरसाल दरशेकडा नऊ टक्के व्याजाने रक्कम मिळेपर्यंत द्यावे, शिवाय तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रूपये द्यावे, आणि तक्रारीचा खर्च म्हणून पाच हजार रूपये द्यावे असा आदेश दिला आहे.(प्रतिनिधी)