शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

भाजपाने केवळ लोकहिताच्या योजनांचे नामांतरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:23 IST

केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : गोंदिया तालुक्यात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही. सत्तारुढ सरकार केवळ योजनांचे नामाकरण करणारे सरकार असल्याची टीका आ. गोपालदास अग्रवाल यांनी केली.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी खा. नाना पटोले, आ.प्रकाश गजभिये, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चुन्नीभाऊ बेंद्रे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी, राकेश ठाकूर, शकील मन्सूरी, अपूर्व अग्रवाल, नानू मुदलियार, सतीश देशमुख उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, सत्तारुढ सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव महात्मा फुले योजना केले मात्र योजनेच्या लाभापासून लाभार्थ्यांना दूर ठेवण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून हजारो शेतकरी अजुनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावावर पेट्रोल व डिझेलवर कृषी कर लावला. प्रत्यक्षात या निधीचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जात नसल्याचे चित्र आहे. सत्तारुढ सरकारची ध्येय धोरणे ही जनहीत विरोधी असून अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले.पटोले म्हणाले, भाजप सरकारच्या काळात प्रत्येक नागरिक लाईनमध्ये उभा आहे. कधी नोटबंदी तर कधी पीक विमा तर कधी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. जनधन योजनेतंर्गत नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने जनधन खात्यातून खातेदारांना पैसे काढण्याकरीता प्रतिबंध लावले आहे. महागाई आटोक्यात आणण्याऐवजी विविध कर लावून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढविल्या.त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अशा खोटारट्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हिच योग्य वेळ आहे. यासाठी कुकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल