शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

भाजपाने केवळ लोकहिताच्या योजनांचे नामांतरण केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:23 IST

केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : गोंदिया तालुक्यात प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र आणि राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. यामुळे लोककल्याणाची कामे सुरू होती. मात्र केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेल्या भाजप सरकारने मागील चार वर्षांत विविध कल्याणकारी योजनांची नावे बदलविण्यापलिकडे काहीच केले नाही. सत्तारुढ सरकार केवळ योजनांचे नामाकरण करणारे सरकार असल्याची टीका आ. गोपालदास अग्रवाल यांनी केली.भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया तालुक्यातील दवणीवाडा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी खा. नाना पटोले, आ.प्रकाश गजभिये, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, आरोग्य व शिक्षण सभापती रमेश अंबुले, महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती चुन्नीभाऊ बेंद्रे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी, राकेश ठाकूर, शकील मन्सूरी, अपूर्व अग्रवाल, नानू मुदलियार, सतीश देशमुख उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, सत्तारुढ सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव महात्मा फुले योजना केले मात्र योजनेच्या लाभापासून लाभार्थ्यांना दूर ठेवण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अद्यापही कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसून हजारो शेतकरी अजुनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना मदत देण्याच्या नावावर पेट्रोल व डिझेलवर कृषी कर लावला. प्रत्यक्षात या निधीचा वापर शेतकऱ्यांसाठी केला जात नसल्याचे चित्र आहे. सत्तारुढ सरकारची ध्येय धोरणे ही जनहीत विरोधी असून अशा सरकारला धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे आ.अग्रवाल यांनी सांगितले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा.पिरिपाचे अधिकृत उमेदवार मधुकर कुकडे यांना साथ देण्याचे आवाहन केले.पटोले म्हणाले, भाजप सरकारच्या काळात प्रत्येक नागरिक लाईनमध्ये उभा आहे. कधी नोटबंदी तर कधी पीक विमा तर कधी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे राहावे लागत आहे. जनधन योजनेतंर्गत नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने जनधन खात्यातून खातेदारांना पैसे काढण्याकरीता प्रतिबंध लावले आहे. महागाई आटोक्यात आणण्याऐवजी विविध कर लावून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढविल्या.त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून अशा खोटारट्या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची हिच योग्य वेळ आहे. यासाठी कुकडे यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल