शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

भाजप सरकारने जनहितार्थ योजना बंद केल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:41 IST

विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गोरेगाव तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विकास आणि जनहितार्थ योजना राबविण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने प्रत्यक्षात याविरुध्द काम केले आहे. गोरगरीब व सर्वसामान्यांच्या हितार्थ राबविल्या जात असलेल्या जनहितार्थ योजना भाजप सरकारने बंद जनतेचा विश्वासघात केला. गोसेखुर्दसारख्या महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्पाचा निधी रोखून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केल्याची टिका खा.प्रफुल्ल पटेल यांनी केली.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) गोरेगाव तालुक्यातील कालीमाटी, हिराटोला, चोपा, मुंडीपार, बोटे, कुºहाडी व कवलेवाडा येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी उमेदवार नाना पंचबुध्दे, माजी आ.दिलीप बन्सोड, के.आर.शेंडे, पी.जी.कटरे, झामसिंग बघेले, मनोहर चंद्रिकापुरे, जगदीश येरोला, ज्योती वालदे, कैलाश डोंगरे, राजू भेलावे, ललिता बहेकार, डेमेंद्र रहांगडाले, केवल रहांगडाले, लक्ष्मण चंद्रिकापुरे उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, भाजप सरकारने अनेक महत्त्वपूर्ण योजना बंद करुन विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम केले. मागील दोन वर्षांपासून मनरेगाच्या मजुरांना वेतन मिळाले नाही, इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मानधन व ओबीसी विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. तर नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण समजली जाणारी बीआरजीएफ योजना , राष्ट्रीय आरोग्य अभियानासारख्या योजनेत कपात करुन त्या योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र अद्यापही या योजनेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही योजना सुध्दा जुमलेबाज निघाली. तर धानाला लागवड खर्चावर आधारित हमीभाव देण्याची घोषणा केली होती पण याची सुध्दा पुर्तता सरकारने केली नाही.निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मागील चार वर्षांत यंदा प्रथमच धानाला ५०० रुपये बोनस जाहीर केले. मात्र याचा सुध्दा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला नाही. जीएसटी कर प्रणाली लागू करुन लहान उद्योग बंद पाडून रोजगार हिरावण्याचे काम केले. तर पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरची दरवाढ करुन सर्वसामान्यांना जीणे मुशीकल केले आहे. त्यामुळे अशा विश्वासघाती आणि जनतेच्या अपेक्षा भंग करणाऱ्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. तसेच गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्यास सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा सभेला संबोधित केले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल