शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

मोठे तुपाशी, छोटे स्टेशन उपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2016 00:25 IST

मुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत येणारे सालेकसा रेल्वे स्टेशन हे काही एक्सप्रेस गाड्यांचा

विजय मानकर सालेकसामुंबई-कोलकाता या मुख्य रेल्वे मार्गावर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेअंतर्गत येणारे सालेकसा रेल्वे स्टेशन हे काही एक्सप्रेस गाड्यांचा थांबा असणारे महाराष्ट्रातील पूर्वेकडील पहिले स्टेशन आहे. तालुका मुख्यालयी असलेल्या या स्टेशनवर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र एकीकडे गोंदियासारख्या मोठ्या स्टेशनवर विविध सोयीसुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना सालेकसासह इतर छोट्या स्थानकांना मात्र रेल्वे प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते.थांबा असणाऱ्या प्रत्येक एक्स्प्रेस आणि लोकल गाड्यांना येथून भरपूर प्रवासी मिळत असताना त्या प्रवाशांच्या गैरसोयींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हे रेल्वे स्टेशन समस्यांचे माहेरघर झाले आहे. सर्वसामान्य पुरूष प्रवाशांबरोबर महिला प्रवाशांना या रेल्वे स्टेशनवर अनेक गैरसोयीन्ाां नेहमी तोंड द्यावे लागते. त्यामुळे या रेल्वेस्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ‘अच्छे दिन’ केव्हा येणार? असा प्रश्न तमाम रेल्वे प्रवाशांना पडला आहे.देशातील सर्वात जास्त व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गापैकी एक असा मुंबई-हावडा रेल्वे मार्ग आहे. या मार्गावरून कोलकाता ते मुंबई दरम्यान तसेच मधातील अनेक महत्वाच्या मोठ्या स्टेशनपर्यंत या मार्गावरून गाड्या धावतात. याशिवाय दिल्ली मार्गावर धावणाऱ्या व दक्षिण मार्गावर सुध्दा या मार्गावरून शेकडो गाड्यांची वर्दळ या मार्गावरून सुरू असते. सालेकसा रेल्वे स्टेशन वर २४ तासात सहा लोकल गाड्या तसेच दोन एक्सप्रेस गाड्या थांबतात. यात बिलासपूर ते अमृतसर नावाने धावणारी छत्तीसगड एक्सप्रेस दिल्ली मार्गावर कुठेही जाण्यासाठी उपयोगी गाडी आहे. तसेच हावडा-कुर्ला एक्सप्रेस ही मुंबईपर्यंत कुठेही जाण्यासाठी महत्वाची गाडी आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांसाठी येथे सालेकसा तालुक्यासह शेजारच्या मध्यप्रदेशचे प्रवासी सुध्दा येतात. लोकल गाड्यांमध्ये निम्या गाड्यांचा थांबा येथे रात्रीच्या वेळेतही असतो. एकंदरीत २४ तासातून १४-१५ वेळा या रेल्वे स्टेशनवरून प्रवासी बसतात आणि उतरतात. अशात प्रवाशांना रात्र झाली तर झोपण्याची सोय, शौचालयाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय खाण्यापिण्याच्या वस्तुची सोय, एवढेच नाही तर नक्षलग्रस्त भाग असताना पोलिसांची सुरक्षा या महत्वाची सोयी अतिआवश्यक असतात. परंतु या रेल्वे स्टेशनवर यापैकी कोणतीही सोय व्यवस्थित नाही. त्यामुळे नेहमी या स्टेशनवरील प्रवाशांना विविध अडचणीना सामना करावा लागतो. नक्षलग्रस्त भागात असणाऱ्या या रेल्वे स्टेशनवर रात्रीला गाडीवरून उतरणारा प्रवाशी आपल्या घरापर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला रात्र या स्टेशनवरच काढावी लागते. परंतु या स्टेशनवर प्रवाशी निवांत झोप घेऊन रात्र काढणे अतिशय जिकरीचे आहे. सुरक्षित प्रतिक्षालय व झोपण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने येथे प्रवाशांना जागे राहूनच रात्र काढावी लागते. महिला प्रवाशांसाठी तर पूर्ण असुरक्षित असे हे स्थानक आहे. दार नसलेले एक छोटे प्रतीक्षालय असून येथे सर्वत्र नेहमी घाण पसरली असते. स्टेशन मास्तरने एक सफाईगार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात स्वच्छतेचा अभाव दिसून आला. रात्रीला प्रवास करून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना या ठिकाणी असभ्य वागणूक मिळण्याची भिती नेहमी असते. अशात येथे रेल्वे सुरक्षाबल सुध्दा पुरविण्यात येत नाही. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी एका ठिकाणी नळाची व्यवस्था आहे. परंतु तो नळ नेहमी नादुरूस्त असतो. त्यामुळे पिण्याचे पाणी या ठिकाणी उपलब्ध नसते. प्रवाशाना स्वत:च बाहेरून पाण्याची व्यवस्था करून घ्यावी लागते. आवश्यक झाल्यास स्टेशन बाहेर हॉटेलात जाऊन तहान भागवावी लागते. उन्हाळ्याच्या दिवसात तरी प्रवाशांना थंड पाणी मिळावे अशी अपेक्षा असते. परंतू ती सोयसुद्धा नाही.