शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

लिंकिंगवर राहणार आता भरारी पथकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांनी या विरोधात कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर आरसीएफ कंपनीला विक्री बंदचे आदेश दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खतावरील लिंकिंगचा प्रकार बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर काही खतविक्रेत्या कंपन्याकडून लिंकिंग केली जात आहे. याचाच भुर्दंड शेतकरी आणि कृषी केंद्र संचालक या दोघांनाही बसत आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली असून, खतविक्रेत्यांना कंपन्यांना सुद्धा तंबी दिल्याची माहिती आहे. खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांनी या विरोधात कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर आरसीएफ कंपनीला विक्री बंदचे आदेश दिले होते. त्यानंतर हे आदेश रिलीज करण्यात आले. तसेच कुठल्याही खतावर लिंकिंग न करण्याचा सूृचना कंपनीला देण्यात आल्या होत्या. मात्र यानंतरही लिंकिंगचा प्रकार सुरूच होता. लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने गठित केलेल्या भरारी पथकाने यावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच खतविक्रेत्या कंपन्यांना सुद्धा लिकिंग न करण्याच्या सूचना केल्या. कंपन्याकडून लिंकिंग सुरू असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. एक बॅग युरिया घेण्यासाठी त्यांना ११५० रुपयांच्या संयुक्त खताची खरेदी करावी लागत होते. त्यामुळे गरज नसताना शेतकऱ्यांना हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. 

कृषी केंद्राची तपासणी - कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खतावरील लिंकिंगच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.१९) शहरातील काही कृषी केंद्राची पाहणी करून त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कंपन्याकडून लिंकिंगसाठी जबरदस्ती करण्यात आल्यास त्याची लेखी तक्रार कृषी विभागाकडे करण्याच्या सूचना सुद्धा कृषी केंद्र संचालकांना करण्यात आल्या आहे. भरारी पथके अनेक कारवाई शून्य- दरवर्षी खरीप हंगामाच्या काळात खते, बियाणे यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके गठित केली जातात. मात्र शेतकऱ्यांची लूट आणि दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊनदेखील विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. भरारी पथके अनेक कारवाई मात्र शून्य अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी