शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

लिंकिंगवर राहणार आता भरारी पथकांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांनी या विरोधात कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर आरसीएफ कंपनीला विक्री बंदचे आदेश दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रासायनिक खतावरील लिंकिंगचा प्रकार बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर काही खतविक्रेत्या कंपन्याकडून लिंकिंग केली जात आहे. याचाच भुर्दंड शेतकरी आणि कृषी केंद्र संचालक या दोघांनाही बसत आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करताच कृषी विभागाची यंत्रणा कामाला लागली असून, खतविक्रेत्यांना कंपन्यांना सुद्धा तंबी दिल्याची माहिती आहे. खरीप हंगामात युरिया खताची सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे याच संधीचा फायदा काही खतविक्रेत्या कंपन्या घेत आहे. मागील आठवड्यात आरसीएफ आणि नर्मदा कंपनीकडून युरिया खतासह संयुक्त खताची उचल करण्याची सक्ती कृषी केंद्र संचालकावर केली जात होती. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांनी या विरोधात कृषी विभागाकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर आरसीएफ कंपनीला विक्री बंदचे आदेश दिले होते. त्यानंतर हे आदेश रिलीज करण्यात आले. तसेच कुठल्याही खतावर लिंकिंग न करण्याचा सूृचना कंपनीला देण्यात आल्या होत्या. मात्र यानंतरही लिंकिंगचा प्रकार सुरूच होता. लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित केल्यानंतर कृषी विभागाने गठित केलेल्या भरारी पथकाने यावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच खतविक्रेत्या कंपन्यांना सुद्धा लिकिंग न करण्याच्या सूचना केल्या. कंपन्याकडून लिंकिंग सुरू असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. एक बॅग युरिया घेण्यासाठी त्यांना ११५० रुपयांच्या संयुक्त खताची खरेदी करावी लागत होते. त्यामुळे गरज नसताना शेतकऱ्यांना हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. 

कृषी केंद्राची तपासणी - कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खतावरील लिंकिंगच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.१९) शहरातील काही कृषी केंद्राची पाहणी करून त्यांच्याकडून माहिती घेतली. तसेच कंपन्याकडून लिंकिंगसाठी जबरदस्ती करण्यात आल्यास त्याची लेखी तक्रार कृषी विभागाकडे करण्याच्या सूचना सुद्धा कृषी केंद्र संचालकांना करण्यात आल्या आहे. भरारी पथके अनेक कारवाई शून्य- दरवर्षी खरीप हंगामाच्या काळात खते, बियाणे यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके गठित केली जातात. मात्र शेतकऱ्यांची लूट आणि दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी पुढे येऊनदेखील विक्रेत्यांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. भरारी पथके अनेक कारवाई मात्र शून्य अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी