शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांच्या तोंडाला पुसल्या गेली पाने

By admin | Updated: October 21, 2014 22:54 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व्यापक लोकसहभाग अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य केल्यास त्यांचा सत्कार करण्याचे

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत व्यापक लोकसहभाग अपेक्षित आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य केल्यास त्यांचा सत्कार करण्याचे शासनाने ठरविले होते. परंतु या मोहिमेला सहा वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने मोहीम राबविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान केला नाही.तंटामुक्त गाव मोहीम प्रभावीपणे राबविण्यासठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती, तालुका स्तरावरील समिती व पोलीस ठाणे स्तरावरील समिती तयार केली. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तंटामुक्त गाव समितीस येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करून त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित केले. यासाठी शासन मोहीम राबविणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करणार होते. या मोहिमेसाठी मोहीम अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. परंतु शासनाने त्यांचा सत्कार केला नाही.विभागीय आयुक्त आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (परिक्षेत्र) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मोहिमेच्या अंमलबजावणीचा वेळोवेळी आढावा घेऊन प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सुचविले. मोहिमेतील कामकाज हे वेगळ्या स्वरूपाचे असल्याने विकास प्रशासकीय व पोलीस यंत्रणेस व्यापक लोकसंवाद साधून समर्पितपणे काम करावे लागले. त्या दृष्टीने मोहिमेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या विकास प्रशासकीय व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना खालीलप्रमाणे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार, असे शासन निर्णयात नमूद केले. महसूल विभागातील राज्यातील सहा महसूल विभागांपैकी ज्या महसूल विभागात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजे त्या विभागातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेच सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी सर्व विभागांपेक्षा अधिक असेल, अशा विभागाच्या विभागीय आयुक्तांना त्यांनी केलेल्या सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. पोलीस परिक्षेत्रातील राज्यातील सात पोलीस परिक्षेत्रांपैकी ज्या पोलीस परिक्षेत्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या परिक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी सर्व परिक्षेत्रांपेक्षा अधिक असेल, अशा पोलीस परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक महसूल विभागातून त्या महसूल विभागात असलेल्या जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतीच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या विभागातील इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक असेल, अशा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून ज्या तालुक्यांमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा अधिक असेल, अशा तालुक्याचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची सर्वोत्कृष्ट अंमलबजावणी होईल म्हणजेच त्या पोलीस ठाणे परिक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतींच्या तुलनेत सदर मोहिमेच्या अंमलबजावणी वर्षात तंटामुक्त गावांची टक्केवारी त्या जिल्ह्यातील इतर पोलिस ठाणे परिक्षेत्रांपेक्षा अधिक असेल, अशा पोलीस ठाण्यांचे प्रमुख यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. गावपातळीवर जिल्ह्यातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या तंटामुक्त गावातील बीट हवालदार, गाव कामगार तलाठी व ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल, असे ठरले होते. मात्र शासन निर्णयाप्रमाणे सदर मोहीम राबविण्यात येत नसल्याची ओरड सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)